शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी नागरिकांचे हाल

By admin | Updated: July 16, 2015 00:59 IST

करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने ....

करडी (पालोरा) : करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने कृषी, व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्रांना जबर फटका बसत आहे. आर्थिक व व्यावसायीक नुकसानीने तीव्र उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत आहे. त्वरित भारनियमन बंद करून सेवा २४ तास वीज देण्याची मागणी सर्व क्षेत्रातून होत आहे. मागीलवर्षी दमदार पावसामुळे आषाढ महिन्यात रोवणीच्या कामाला सुरूवात झालेली होती. मात्र यावर्षी सुरूवतीच्या पावसानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे. पाऊस बेपत्ता असून पऱ्हे करपली. तलाव, नाले आदी पाण्याविणा जेमतेम भरली. ज्या शेतकऱ्यांकडे तलाव बोरवेल्स आहेत त्यांनी रोवणीस प्रारंभ केला मात्र भारनियमनामुळे तेही खोळंबली. पऱ्हे वाचविण्यासाठी सुद्धा विजेचा उपयोग होत नसल्याने आधीच धानाच्या कमी भावाने मोडलेला शेतकरी राजकारण्यांचे नावे ओरडू लागला आहे.सेवा, उद्योग, व्यापाऱ्याला फटकाग्रामीण भागात तुरळक प्रमाणात उद्योग व व्यापार केला जातो. पिक गिरण्या, धान गिरण्यात अन्य व्यवसाय भारनियमनाने दिवसभर बंद असतात. व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न त्यांचेकडून विचारला जात आहे. उद्योगावर आधारित व्यापारही त्यामुळे अडचणीत सापडले असून मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. सेवा क्षेत्र सुद्धा गर्मीने बेहाल असून बँक, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, विद्यार्थी व नागरिक त्रस्त आहेत. सकाळच्या पाळीत शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे तर उद्योग व व्यापार सुरळीत होण्यासाठी भारनियमन बंद करण्याची अपेक्षा संबंधितांची आहे.पावसाळ्याच्या वातावरणात तीव्र गर्मी विविध आजारांना आमंत्रण देणारी ठरली असून हगवण, उलटी, मलेरिया, दूषित पाण्याच्या रोगांनी हातपाय पसारले आहेत. भारनियमनामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत असून नळ योजना अडचणीत सापडल्या आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. विद्युत विभागाने नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे, सेवा पुर्ववत करण्याची आवश्यकता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.(वार्ताहर)काही जलविद्युत प्रकल्पाचे संच बंद पडले आहेत. मागणी अचानक वाढली आणि पुरवठा अपुरा होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून भारनियमनाचे आदेश असतात. या संदर्भाने तत्काळ उपाय योजना म्हणून ग्रामीण व शहरी भागातही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे भारनियमन केव्हापर्यंत बंद होणार सध्यातरी सांगता येत नाही.- ज्ञानेश्वर लांडे, कनिष्ठ अभियंता, विद्युत वितरण कंपनी शाखा करडी.