शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

विजेअभावी नागरिकांचे हाल

By admin | Updated: July 16, 2015 00:59 IST

करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने ....

करडी (पालोरा) : करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने कृषी, व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्रांना जबर फटका बसत आहे. आर्थिक व व्यावसायीक नुकसानीने तीव्र उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत आहे. त्वरित भारनियमन बंद करून सेवा २४ तास वीज देण्याची मागणी सर्व क्षेत्रातून होत आहे. मागीलवर्षी दमदार पावसामुळे आषाढ महिन्यात रोवणीच्या कामाला सुरूवात झालेली होती. मात्र यावर्षी सुरूवतीच्या पावसानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे. पाऊस बेपत्ता असून पऱ्हे करपली. तलाव, नाले आदी पाण्याविणा जेमतेम भरली. ज्या शेतकऱ्यांकडे तलाव बोरवेल्स आहेत त्यांनी रोवणीस प्रारंभ केला मात्र भारनियमनामुळे तेही खोळंबली. पऱ्हे वाचविण्यासाठी सुद्धा विजेचा उपयोग होत नसल्याने आधीच धानाच्या कमी भावाने मोडलेला शेतकरी राजकारण्यांचे नावे ओरडू लागला आहे.सेवा, उद्योग, व्यापाऱ्याला फटकाग्रामीण भागात तुरळक प्रमाणात उद्योग व व्यापार केला जातो. पिक गिरण्या, धान गिरण्यात अन्य व्यवसाय भारनियमनाने दिवसभर बंद असतात. व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न त्यांचेकडून विचारला जात आहे. उद्योगावर आधारित व्यापारही त्यामुळे अडचणीत सापडले असून मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. सेवा क्षेत्र सुद्धा गर्मीने बेहाल असून बँक, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, विद्यार्थी व नागरिक त्रस्त आहेत. सकाळच्या पाळीत शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे तर उद्योग व व्यापार सुरळीत होण्यासाठी भारनियमन बंद करण्याची अपेक्षा संबंधितांची आहे.पावसाळ्याच्या वातावरणात तीव्र गर्मी विविध आजारांना आमंत्रण देणारी ठरली असून हगवण, उलटी, मलेरिया, दूषित पाण्याच्या रोगांनी हातपाय पसारले आहेत. भारनियमनामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत असून नळ योजना अडचणीत सापडल्या आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. विद्युत विभागाने नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे, सेवा पुर्ववत करण्याची आवश्यकता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.(वार्ताहर)काही जलविद्युत प्रकल्पाचे संच बंद पडले आहेत. मागणी अचानक वाढली आणि पुरवठा अपुरा होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून भारनियमनाचे आदेश असतात. या संदर्भाने तत्काळ उपाय योजना म्हणून ग्रामीण व शहरी भागातही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे भारनियमन केव्हापर्यंत बंद होणार सध्यातरी सांगता येत नाही.- ज्ञानेश्वर लांडे, कनिष्ठ अभियंता, विद्युत वितरण कंपनी शाखा करडी.