शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

तलावांची क्षमता वाढणार

By admin | Updated: May 4, 2015 00:44 IST

जिल्ह्यात मामा तालावाची संख्या अधिक असली तरी त्यांची साठवण क्षमता अतिशय कमी आहे.

जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ : सीईओ राहुल द्विवेदी यांचे प्रतिपादन करडी (पालोरा) : जिल्ह्यात मामा तालावाची संख्या अधिक असली तरी त्यांची साठवण क्षमता अतिशय कमी आहे. सिंचन क्षेत्रावर त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यासाठीच जलयुक्त शिबिर योजना उपयुक्त आहे. तलावाचे खोलीकरण यातून होईल, बांध-बंधारे बांधले जातील. लोकसहभागातून विकासाची कामे होतील. करडी गावात शुभारंभ होत असून धोरणानुसार सर्व गावे टंचाईमुक्त होतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कायकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.करडी येथील गणपती तलावावर आयोजित जलयुक्त शिवार योजनेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, तलावांच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे. यासाठी केंद्र शासनाने १०० कोटींचे पॅकेज दिले आहे. यातूनच तलावाचे खोलीकरण होईल, त्यामुळे बेरोजगारी दूर होईल. राज्यात ४२ हजार सिंचन विहिरी रोहयो मधून खोदल जातील. कृषी पंपासाठी विद्युत कनेक्शन तत्काळ लावले जाण्यासाठी सुध्दा पैश्याची तरतुद करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना कंत्राटदार फायदा पोहचविण्यासाठी नाही, कामात गैरप्रकार कोणत्याही स्तरावर जाणवल्यास तत्काळ माहिती दया, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे शुभारंभावेळी व्यासपीठावर सीईओ राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे, बाबु ठवकर, उपेश बांते, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एच. गुप्ता, सरपंच सीमा साठवणे, युवराज जमईवार, भगवान चांदेवार, धनवर बडगे, माणिक शेंडे, महादेव बुरडे, भाऊराव लाळे, गौरिशंकर नेरकर, शाखा अभियंता चाचीरे, कृषी मंडळ अधिकारी आर. जी. गायकवाड, निमचंद्र चांदेवार प्रामुख्याने हजर होते. संचालन व आभार भास्कर गाढवे यांनी तर प्रास्ताविक महेंद्र शेंडे यांनी केले. (वार्ताहर)पाटबंधारे उपविभागाची मागणीमोहाडी तालुक्यासाठी चार वर्षापुर्वी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपविभाग मंजूर करण्यात आले. मात्र, उपविभागाची जागा व बांधकाम झालेले नाही. जिल्ह्यात अभियंत्याची कमतरता आहे. वेळेवर कामे होत नाही. मोहाडी येथे उपविभाग सुरु केल्यास लोकांची कामे कमी खर्चात व वेळेत होऊन, कर्मचाऱ्यांचा, अभियंत्यांचा स्टॉफ वाढेल, सीईओ द्विवेदी व आमदार वाघमारे यांनी या दृष्टीने प्रयत्न करावे, समस्या सोडवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांनी प्रास्ताविकातून केली.