शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

बहिणीने पोलिसात तक्रार दिल्याच्या तणावात भावाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2022 17:11 IST

मांढळची घटना : दोन महिन्यांपूर्वी बहिणीवर केला होता चाकूहल्ला

लाखांदूर (भंडारा) : घरगुती वादात भावाने बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. बहिणीने पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून तणावात असलेल्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील मांढळ येथे बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

गोविंदा अर्जुन कांबळे (६०) रा. मांढळ असे मृताचे नाव आहे. त्याचे बहीण मैनाबाई चंडी मेश्राम (४५) रा. जुनोना ता. पवनी सोबत दोन महिन्यांपूर्वी वाद झाला होता. या वादात गोविंदाने बहिणीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी लाखांदूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गोविंदा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी देखील गोविंदाने विष प्राशन केले होते. मात्र त्याच्यावर लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने तो बचावला होता. मात्र तो नेहमीच तणावात राहत असल्याची महिती आहे.

बुधवार २१ सप्टेंबर रोजी गोविंदाची न्यायालयात तारीख होती. मंगळवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपी गेले. बुधवारी पहाटे घरामागील भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली.

लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक ऋषी गभने, हवालदार गोपाल कोसरे, पोलीस अंमलदार योगराज घरट यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद लाखांदूर ठाण्यात घेण्यात आली असून तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूbhandara-acभंडारा