शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आरक्षण सोडतीने इच्छुकांचा अपेक्षा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती.

ठळक मुद्देसरपंच आरक्षण : अनेक गावांत बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहुप्रतीक्षित सरपंचपदाचीआरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली आणि अनेक दिवसांपासून सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या अपेक्षा भंग झाला. काही ग्रामपंचायतीमध्ये तर बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात आली. नुकत्याच झालेल्या १४८ ग्रामपंचायतींमध्ये या सोडतीची प्रचंड उत्सुकता असल्याने  नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती. तहसील कार्यालयात एका एका ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित होत होते तसतसी उत्सुकता शिगेला पाेहाेचत होती. अपेक्षित आरक्षण निघालेले गट उत्साहात जल्लोष करीत होते तर अपेक्षित आरक्षण न निघालेल्या गटाचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बहुतांश गट ग्रामपंचायती आहेत. सात ते नऊ सदस्य निवडून आले आहे. सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे हे माहीत  नसताना निवडणूक लढविली गेली. शुक्रवारी आरक्षणाची सोडत निघाली. तेव्हा अनेक ठिकाणी बहुमत एका गटाला आणि आरक्षणामुळे सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली होती. काही ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंचासाठी आरक्षित प्रवर्गातून एकच उमेदवार निवडून आल्याने त्यालाच सरपंच करण्याशिवाय पर्याय नाही.  शुक्रवारी काढण्यात आलेले आरक्षण २०२० ते २०२५ या कालावधीसाठी राहणार आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही शुक्रवारी एकाच वेळी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

मेहनतीवर पाणी फिरले ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. सरपंचपद आपल्याच गटाला मिळेल, अशी आशा बाळगून निवडणुकीचे नियोजन केले. वारेमाप खर्चही करण्यात आला. मात्र शुक्रवारी घोषित आरक्षणाने अनेकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७५, भंडारा ९४, पवनी ८९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आता लक्ष उपसरपंच पदावर  आरक्षण सोडतीने सरपंच पदाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. मात्र स्वस्त बसतील ते गावपुढारी कसले. आता सरपंचपद नाही तर उपसरपंचपद तरी आपल्या गटाला मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक ठिकाणचा घोडेबाजारही थंड बस्त्यात दिसत आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंचreservationआरक्षण