शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

आरक्षण सोडतीने इच्छुकांचा अपेक्षा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती.

ठळक मुद्देसरपंच आरक्षण : अनेक गावांत बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहुप्रतीक्षित सरपंचपदाचीआरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली आणि अनेक दिवसांपासून सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या अपेक्षा भंग झाला. काही ग्रामपंचायतीमध्ये तर बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात आली. नुकत्याच झालेल्या १४८ ग्रामपंचायतींमध्ये या सोडतीची प्रचंड उत्सुकता असल्याने  नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती. तहसील कार्यालयात एका एका ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित होत होते तसतसी उत्सुकता शिगेला पाेहाेचत होती. अपेक्षित आरक्षण निघालेले गट उत्साहात जल्लोष करीत होते तर अपेक्षित आरक्षण न निघालेल्या गटाचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बहुतांश गट ग्रामपंचायती आहेत. सात ते नऊ सदस्य निवडून आले आहे. सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे हे माहीत  नसताना निवडणूक लढविली गेली. शुक्रवारी आरक्षणाची सोडत निघाली. तेव्हा अनेक ठिकाणी बहुमत एका गटाला आणि आरक्षणामुळे सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली होती. काही ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंचासाठी आरक्षित प्रवर्गातून एकच उमेदवार निवडून आल्याने त्यालाच सरपंच करण्याशिवाय पर्याय नाही.  शुक्रवारी काढण्यात आलेले आरक्षण २०२० ते २०२५ या कालावधीसाठी राहणार आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही शुक्रवारी एकाच वेळी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

मेहनतीवर पाणी फिरले ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. सरपंचपद आपल्याच गटाला मिळेल, अशी आशा बाळगून निवडणुकीचे नियोजन केले. वारेमाप खर्चही करण्यात आला. मात्र शुक्रवारी घोषित आरक्षणाने अनेकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७५, भंडारा ९४, पवनी ८९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आता लक्ष उपसरपंच पदावर  आरक्षण सोडतीने सरपंच पदाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. मात्र स्वस्त बसतील ते गावपुढारी कसले. आता सरपंचपद नाही तर उपसरपंचपद तरी आपल्या गटाला मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक ठिकाणचा घोडेबाजारही थंड बस्त्यात दिसत आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंचreservationआरक्षण