शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अरुंद रस्त्यांवर हाड मोडणाऱ्या खड्ड्यांची भरमार; भंडारकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:02 IST

रहदारीचे मुख्य मार्गच जीवघेणे : भंडारा पालिकेसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हे आहेत 'डेंजरस' रस्ते

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पितळी भांडे, कोळसा, धान, मॅग्नीज, रेती यासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचे शहर मुख्यालय आता खड्यांसाठीही प्रसिद्ध झाले की काय? असे निदर्शनास येत आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर हाड मोडणारे जीवघेण्या खड्यांची भरमार झाली आहे. पावसाने रस्त्यांचे पितळ उघडे तर पाडलेच गुणवत्ताहीन कामाचीही पोलखोल केली आहे.

शहारात पार्किंगचा अभाव आहे. अतिक्रमणाची समस्या उग्र रूप धारण करून आहे. भंडारा शहरात बाहेरचा कुणी व्यक्ती आल्यास त्याचे स्वागत गचक्याने होते. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच खड्डे आहेत. तर शहराची काही स्थिती असेल याची जाणीव प्रत्यक्षरीत्या कदाचित त्या व्यक्तीला येत असावी, अंतर्गत रस्तेही खड्यांपासून सुटलेले नाहीत. महिनाभरात आलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची चांगलीच पोलखोल केली. काही मार्गावर तर एवढे जीव घेणे खड्डे आहेत की कुणाचा बळी जाईल याचा नेम नाही.

हे आहेत डेंजरस रस्ते शहरातील मिस्कीन टैंक चौक ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौंक सर्वात डेंजर रस्ता ठरल आहे. यानंतर राजीव गांधी चौक ते नागपूर बायपास मार्ग सर्वात डेंजरस ठरला आहे. गल्लीबोडीतील खड्डे तर विचारूच नका. मात्र या रस्त्यांची डागडुजी असो की रस्ते निर्मिती याकडे पालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे. हा रस्ता आमच्या हद्दीत येत नाही, म्हणून चेंडू एकमेकांच्या दालनात टोलवला जात आहे.

टॅक्स द्यावे आणि खड्यातून जावेभंडारेकर पालिका प्रशासनाला टॅक्स देतात. या कराच्या माध्यमातूनच शहराचा चांगला विकास व्हावा, अशी जनसामान्यांची इच्छा असते. मात्र भंडारा शहर पालिका हद्दीतील रस्त्यांची लागलेली वाट व बिकट अवस्था पाहून विचारच येतो. पालिका प्रशासनाला कर देऊनही हाड मोडणाऱ्या रस्त्यातून वाटचाल करीत असताना अनेक प्रश्न उ‌द्भवतात. एखादवेळी जीवित हानी झाली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. उल्लेखनीय म्हणजे काही रस्त्यांवरील खड्डे चक्क अर्धा ते पाऊण फूट खोल आहेत. त्यात पावसाचे पाणी गेल्यावर ते किती खोल आहे, याची कल्पना येत नसल्याने सहजपणे अपघात घडत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाbhandara-acभंडारा