शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मृतदेहासह जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली.

ठळक मुद्देखड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी : राष्ट्रीय महामार्गावरुन वाहतूक ठप्प, नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काम खोळंबलेल्या रस्त्यावरील खड्ड्याने झालेल्या अपघातात तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करीत शेकडो नागरिकांनी सोमवारी दुपारी १२ वाजता मृतदेहासह येथील जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस व प्रशासनाची एकच धावपळ उडाली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले मात्र तोपर्यंत जिल्हा कचेरीसमोर वातावरण चांगलेच तापले होते.भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्या मृत्यूला े खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप करी शवविच्छेदनानंतर तरुणांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी शववाहिनीतून मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. राष्ट्रीय महामार्गावर अचानक आलेल्या या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेवून अवघ्या काही वेळातच हा रस्ता सुरळीत केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी चर्चेत माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्टÑवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मृत प्रशांत यांचे वडील नानाजी नवखरे, यशवंत सोनकुसरे, नितीन धकाते आदी सहभागी झाले होते.शहरातील अंतर्गत रस्त्यांचे प्रचंड हाल झाले आहे. त्यातच शितलामाता मंदिर ते खांब तलाव हा रस्ता जीवघेणा झाला आहे. बांधकाम ठप्प् असल्याने या मार्गावर खड्डे पडले आहे. आतापर्यंत अनेक अपघात येथे झाले असून प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. रविवारी भंडारा शहरात झालेल्या अपघाताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आता या रस्त्याचे बांधकाम केव्हा सुरु होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासनअपघातात मृत पावलेल्या प्रशांत नवखरे यांच्या पत्नीला नोकरी, शासनातर्फे ५० लाखांच्या मदतीचा शासनाकडे प्रस्ताव व या बाबीला जबाबदार असलेल्या अधिकाºयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच सदर रस्ताची तात्काळ डागडुजी करण्याचे निर्देश ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता चेपे यांना दिले.तासभरानंतर सुटली कोंडीशवविच्छेदनानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रशांत नवखरे यांच्या मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासन व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांविरुध्द घोषणा दिली. जोपर्यंत अधिकारी मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत मृतदेह येथून हलविणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. दरम्यान तब्बल एक तासाने मागण्यांसंदर्भात कोंडी सुटली.

टॅग्स :Accidentअपघात