शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मृतदेहासह जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली.

ठळक मुद्देखड्ड्यांनी घेतला तरुणाचा बळी : राष्ट्रीय महामार्गावरुन वाहतूक ठप्प, नागरिकांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काम खोळंबलेल्या रस्त्यावरील खड्ड्याने झालेल्या अपघातात तरुणाचा बळी गेल्याचा आरोप करीत शेकडो नागरिकांनी सोमवारी दुपारी १२ वाजता मृतदेहासह येथील जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस व प्रशासनाची एकच धावपळ उडाली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले मात्र तोपर्यंत जिल्हा कचेरीसमोर वातावरण चांगलेच तापले होते.भंडारा शहरातील खात रोड ते जिल्हा परिषद चौक या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र खांबतलाव परिसरात गत सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठाले खड्डे निर्माण झाले आहे. रविवारी सायंकाळी तकीया वॉर्डातील प्रशांत नानाजी नवखरे (३६) हा राजीव गांधी चौकाकडे जात होता. त्यावेळी खड्डा चुकविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि अंगावरुन एसटी बस गेली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्या मृत्यूला े खड्डेच जबाबदार असल्याचा आरोप करी शवविच्छेदनानंतर तरुणांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी शववाहिनीतून मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. राष्ट्रीय महामार्गावर अचानक आलेल्या या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ धाव घेवून अवघ्या काही वेळातच हा रस्ता सुरळीत केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. यावेळी चर्चेत माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राष्टÑवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, मृत प्रशांत यांचे वडील नानाजी नवखरे, यशवंत सोनकुसरे, नितीन धकाते आदी सहभागी झाले होते.शहरातील अंतर्गत रस्त्यांचे प्रचंड हाल झाले आहे. त्यातच शितलामाता मंदिर ते खांब तलाव हा रस्ता जीवघेणा झाला आहे. बांधकाम ठप्प् असल्याने या मार्गावर खड्डे पडले आहे. आतापर्यंत अनेक अपघात येथे झाले असून प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाही. रविवारी भंडारा शहरात झालेल्या अपघाताने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आता या रस्त्याचे बांधकाम केव्हा सुरु होते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासनअपघातात मृत पावलेल्या प्रशांत नवखरे यांच्या पत्नीला नोकरी, शासनातर्फे ५० लाखांच्या मदतीचा शासनाकडे प्रस्ताव व या बाबीला जबाबदार असलेल्या अधिकाºयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच सदर रस्ताची तात्काळ डागडुजी करण्याचे निर्देश ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता चेपे यांना दिले.तासभरानंतर सुटली कोंडीशवविच्छेदनानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रशांत नवखरे यांच्या मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी स्थानिक प्रशासन व महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांविरुध्द घोषणा दिली. जोपर्यंत अधिकारी मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत मृतदेह येथून हलविणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. दरम्यान तब्बल एक तासाने मागण्यांसंदर्भात कोंडी सुटली.

टॅग्स :Accidentअपघात