शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:29 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देविहीर पुनर्भरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ : बंधाऱ्यामुळे मिळतेय शेतीला पाणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. यामुळे विहिरीतील पाण्याच्या पातळीत ३५ टक्के वाढ दिसून आल्याने विहीर पुनर्भरण योजना कमालीची यशस्वी ठरली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचा पेरा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.तसेच याअगोदर बांधलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरुस्ती करुन संपुर्ण लिकेज बंद करण्यात आला असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाऱ्यात साचून राहिले. त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या सर्व शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर सुध्दा पीक वाचविणे शक्य झाले.आजघडीला बंधाऱ्यात अजूनही भरपूर पाणी असल्याने कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल यावरुन असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा पिक घेणे शक्य होईल.यासोबतच दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून सात वनतलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली, तसेच तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आणि एक नवीन बंधारा तयार करण्यात आल्याने दिघोरीच्या सभोवताल पाणी साठविण्याचे जाळे तयार झाले. यावर्षी पोळ्यापासून पावसाने दडी मारली असली तरी दिघोरीत पाण्याची अडचण निर्माण न होता. तलाव व बंधाºयामार्फत शेतीला मुबलक पाणी देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जा उंचावण्यास खूप मोठी मदत झाली.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असला तरी दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून दिघोरीत झालेल्या कामामुळे जमिनीतील भूजल पातळी विशेष घट झाली नसल्याचे विहिरीतील पाण्याच्या स्त्रोतावरुन कळून येते. म्हणून दिघोरीसाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.शासनाची जलयुक्त शिवार सर्वेक्षणाची टिम दिघोरीत दाखल झाली व त्यांनी बंधारे, विहिर पुनर्भरण योजना आदींचा आढावा घेतला असता जलयुक्त शिवार योजना दिघोरीत यशस्वीपणे राबविले असल्याचे अधिकारी मिलिंद शेंडे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. यावेळी भूवैज्ञानिक अजय सांपत, जिल्हा समन्वयक एन. टी. अतकरी, सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार