शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:29 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देविहीर पुनर्भरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ : बंधाऱ्यामुळे मिळतेय शेतीला पाणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. यामुळे विहिरीतील पाण्याच्या पातळीत ३५ टक्के वाढ दिसून आल्याने विहीर पुनर्भरण योजना कमालीची यशस्वी ठरली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचा पेरा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.तसेच याअगोदर बांधलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरुस्ती करुन संपुर्ण लिकेज बंद करण्यात आला असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाऱ्यात साचून राहिले. त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या सर्व शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर सुध्दा पीक वाचविणे शक्य झाले.आजघडीला बंधाऱ्यात अजूनही भरपूर पाणी असल्याने कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल यावरुन असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा पिक घेणे शक्य होईल.यासोबतच दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून सात वनतलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली, तसेच तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आणि एक नवीन बंधारा तयार करण्यात आल्याने दिघोरीच्या सभोवताल पाणी साठविण्याचे जाळे तयार झाले. यावर्षी पोळ्यापासून पावसाने दडी मारली असली तरी दिघोरीत पाण्याची अडचण निर्माण न होता. तलाव व बंधाºयामार्फत शेतीला मुबलक पाणी देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जा उंचावण्यास खूप मोठी मदत झाली.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असला तरी दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून दिघोरीत झालेल्या कामामुळे जमिनीतील भूजल पातळी विशेष घट झाली नसल्याचे विहिरीतील पाण्याच्या स्त्रोतावरुन कळून येते. म्हणून दिघोरीसाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.शासनाची जलयुक्त शिवार सर्वेक्षणाची टिम दिघोरीत दाखल झाली व त्यांनी बंधारे, विहिर पुनर्भरण योजना आदींचा आढावा घेतला असता जलयुक्त शिवार योजना दिघोरीत यशस्वीपणे राबविले असल्याचे अधिकारी मिलिंद शेंडे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. यावेळी भूवैज्ञानिक अजय सांपत, जिल्हा समन्वयक एन. टी. अतकरी, सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार