शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:29 IST

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली.

ठळक मुद्देविहीर पुनर्भरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ : बंधाऱ्यामुळे मिळतेय शेतीला पाणी

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. यामुळे विहिरीतील पाण्याच्या पातळीत ३५ टक्के वाढ दिसून आल्याने विहीर पुनर्भरण योजना कमालीची यशस्वी ठरली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचा पेरा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.तसेच याअगोदर बांधलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरुस्ती करुन संपुर्ण लिकेज बंद करण्यात आला असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाऱ्यात साचून राहिले. त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या सर्व शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर सुध्दा पीक वाचविणे शक्य झाले.आजघडीला बंधाऱ्यात अजूनही भरपूर पाणी असल्याने कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल यावरुन असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा पिक घेणे शक्य होईल.यासोबतच दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून सात वनतलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली, तसेच तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आणि एक नवीन बंधारा तयार करण्यात आल्याने दिघोरीच्या सभोवताल पाणी साठविण्याचे जाळे तयार झाले. यावर्षी पोळ्यापासून पावसाने दडी मारली असली तरी दिघोरीत पाण्याची अडचण निर्माण न होता. तलाव व बंधाºयामार्फत शेतीला मुबलक पाणी देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जा उंचावण्यास खूप मोठी मदत झाली.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असला तरी दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून दिघोरीत झालेल्या कामामुळे जमिनीतील भूजल पातळी विशेष घट झाली नसल्याचे विहिरीतील पाण्याच्या स्त्रोतावरुन कळून येते. म्हणून दिघोरीसाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.शासनाची जलयुक्त शिवार सर्वेक्षणाची टिम दिघोरीत दाखल झाली व त्यांनी बंधारे, विहिर पुनर्भरण योजना आदींचा आढावा घेतला असता जलयुक्त शिवार योजना दिघोरीत यशस्वीपणे राबविले असल्याचे अधिकारी मिलिंद शेंडे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. यावेळी भूवैज्ञानिक अजय सांपत, जिल्हा समन्वयक एन. टी. अतकरी, सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार