शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

अहो ! भुसे काका, गोरगरीब मुलांचे शिक्षण बंद करू नका ! शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:49 IST

Bhandara : संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी पाठवले शिक्षणमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्ली (आंवाडी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळा बंद करून खेड्या-पाड्यातील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे दि. १५ मार्च रोजी निर्गमित झालेला संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्रे पाठवून आमचे शिक्षक कमी करून शाळा बंद करू नका, गावातील शिक्षण वाचवा, शाळा टिकवा, विद्यार्थी घडू द्या, अशी भावनिक हाक दिली आहे. 

नवीन संचमान्यता धोरणामुळे कमी पटसंख्येच्या मराठी शाळांवर गंडांतर येणार असून, शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होतील, परिणामी शिक्षकांअभावी गावातील शाळा बंद होतील. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १७मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत या विषयाकडे लक्ष वेधले होते. 

त्या' पत्रात काय लिहिले

  • 'अहो ! भुसे काका, कमी पटसंख्येमुळे आमचे शिक्षक कमी होणार असे कळले. वर्गाला शिक्षकच नसेल तर आम्ही शाळा सोडायची काय?, गावात शाळाच नसेल तर आम्ही कुठे शिकायचं?,
  • शिक्षक कमी करून आमचे शिक्षण थांबवू नका. तुम्ही आमच्या हिताचा नक्कीच विचार कराल, असा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आपला लाडका विद्यार्थी आपली लाडकी विद्यार्थिनी.' असे पत्र पाठविले.
  • आमचे गावातच २ शिक्षण होण्यासाठी शाळा राहू द्या. गावातील शाळा बंद झाल्यास बाहेरगावच्या शाळेत जायला त्रास होईल. आमचे शिक्षण बंद होईल. शाळेला पुरेसे शिक्षक द्या.

"शासन स्तरावर मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गावातील शाळेतून शाळा व्यवस्थापन समितीने 'शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, विद्यार्थी टिकवा' असा ठराव घेऊन शासनाला पाठविणे आवश्यक आहे. यासाठी गावातील नागरिक तसेच समाजमाध्यमांनी लोकचळवळीचा सनदशीर मार्ग म्हणून मराठी शाळा वाचविण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज आहे."- श्रीधर काकीरकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समिती

"सरकारची शैक्षणिक नीती विद्यार्थ्यांच्या भविष्याची अधोगती करणारी आहे. गोरगरीब व बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षणविरोधी निर्णय घेतले जात आहेत. गावखेड्यातील शाळा बंद करण्याचा तुघलकी डाव हाणून पाडेल. विमाशि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा होऊ देणार नाही."- सुधाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, विमाशि, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षणministerमंत्री