शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:17 IST

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : तब्बल ४५ वर्षानंतर झाले भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन, तर १०७१ हेक्टर शेतीत सिंचनाचा लाभ

आॅनलाईन लोकमतसाकोली : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम करण्यास त्यांची मानसिकताच नव्हती. मात्र आ. बाळा काशिवार यांनी सातत्याने सतत प्रयत्न करुन हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे एक हजार ७१ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होणार असून परिसरात हरितक्रांती घडणार आहे, असे मत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.साकोली तालुक्यातील वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. बाळा काशिवार, सभापती रेखा वासनिक, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सभापती उषाताई डोंगरवार, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, मंदा गणवीर, उपसभापती वर्षा कापगते, सरपंच भिमावती पटले, सरपंच ज्योती वघारे, उपसरपंच धर्मराज भलावी, माजी सरपंच जयनाथ रहांगडाले, चुन्नीलाल वासनिक, माजी सभापती गिताताई कापगते, दादा टिचकुले, प्रकाश बाळबुध्दे, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे या प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी चोपडे उपस्थित होते.ना. बावनकुळे पुढे म्हणाले की, भिमलकसा प्रकल्पाचे कामाला १९७२ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र वनकायद्याच्या अडचणीमुळे हा प्रकल्प बंद करण्यात आला. तेव्हापासून या प्रकल्पाकडे कुणीही लक्ष दिले नाही. तेव्हाच या प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले असते. शासनाचा निधीही कामी लागला असता व या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग शतीकरिता झाला असता.यावर्षी उीपीडीसी अंतर्गत भंडारा जिल्ह्याला १४० कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. पुढच्यावर्षी १७५ कोटी रुपयाची मागणी आपण करणार असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हा निधी वापरण्यात येणारआहे.याशिवाय यावर्षीपासून शासनाच्या नविन योजनांना सुरुवात होणार आहे. यात ज्याची घरे ५०० फुट जागेत बांधली आहेत त्यांना शासनातर्फे मोफत पट्टे देणार आहे. ज्या जमिनी वर्ग २ मधून १ मध्ये आणावयाची आहेत. त्यांना कुठल्याही कागदपत्राची पुर्तता करायची नाही व बांधकाम मजुरांना दरवर्षी ६० रुपये भरुन शासनाच्या १८ योजनांचा लाभ मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.सिंचनाला प्राधान्य : बाळा काशीवार१९७२ पासून रखडलेल्या भिमलकसा प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. यापूर्वी अनेकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभुल केली. या प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण करण्याचा प्रयास असुन या प्रकल्पावरुन सात गावातील एक हजार ७१ हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होणार आहे. फडणवीस सरकारचे सिंचनावर अधिक भर दिला आहे. यात शेततळे, प्रकल्प, यासारख्या विविध उपक्रमाचा समावेश आहे. शेतकरी सुखी तर जग सुखी.नाना पटोलेंना लगावला टोलाना.बावनकुळे यांनी वडेगाव येथे सभा सुरु होती. या सभेदरम्यान ना. बावनकुळे म्हणाले की, निवडणुका या पाच वर्षाकरिता असतात. मात्र काही जन काहीच काम करीत नाही. काम करण्याची त्याची प्रबळ इच्छा नसते. मात्र एक दुसºयावर आरोप प्रत्यारोप करुन कामे न करताच राजीनामे देतात. राजीनामा दयायचाच होता तर निवडणूक कशाला लढवितात व जनतेची दिशाभूल कशी काय करतात,असा टोलाही अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांना लावला.वडेगावसाठी २५ लक्षभिमलकसा प्रकल्पाच्या भुमिपूजनाप्रसंगी आयोजित सभेत ना. बावनकुळे यांनी वडेगावतील विकास कामाकरिता २५ लक्ष रुपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले. यात रस्ते, लाईट यासह विविध कामाचा समावेश करण्यात येणार आहे.लोकांची गर्दीबहुप्रतिष्ठित भिमलकसा प्रकल्पाचे भूमिपूजन होणार म्हणून परिसरातील लोकांत एकच उत्सुकता होती. हा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर गावात सभा झाली. त्यावेळीही लोकांची गर्दी होती. या कार्यक्रमाला नितीन खेडीकर, किशोर पोगडे, बंडू शेंडे, चंद्रकात वडीचार, नगरसेवक सुभाष बागडे, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, भगवान पटले, आनंद सोनवाने, अमोल हलमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संचालन गिता कापगते यांनी तर आभार लखन बर्वे यांनी केले.