शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे.

ठळक मुद्देआज उसळणार भीमसागर : १९५४ साली बाबासाहेब आंबेडकरांचे शहापुरात झाले होते आगमन

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा शहापूर येथील ऐतिहासिक भीममेळावा म्हणजे आंबेडकरी बांधवांचा वारसा होय. दरवर्षी १६ जानेवारीला आयोजित होणाऱ्या या भीम मेळाव्यामागे रोमहर्षक इतिहास असून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. गुरुवार १६ जानेवारी रोजी आयोजित या भीम मेळाव्याला परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील भीमसागर लोटणार आहे.भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे. १९३८ साली शहापूर गावात रोगाने थैमान घातले होते. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एका साधूबाबाला बोलाविले. सूचनेनुसार हवनकुंड बांधण्याचे ठरले. दिवंगत गंगाराम रंगारी यांनी हवनकुंड बांधून दिले. हवनाच्या वेळी रंगारी यांनी हवनकुंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्पृष्याच्या हाताने हवनकुंड बाटेल आणि देवीचा कोप होईल म्हणून त्यांना अडविण्यात आले. या प्रकाराने रंगारी व्यथित झाले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांच्यातील स्वाभीमान जागा झाला. आत्माराम गजभिये, जयराम गजभिये, कवडू खोब्रागडे रंगारी यांच्या मदतीला धावले. गावात अस्पृष्य बांधवांची सभा घेतली आणि स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना आली. लोकवर्गणी आणि श्रमदानातून तेथे मंदिर उभे झाले. विश्वनाथ मंदिर असे त्याचे नामकरण झाले. मंदिराला लागूनच अस्पृष्य कुटुंबातील प्रत्येक दांपत्याला श्रमदानातून तेथे स्वतंत्र विहिर खोदली. हीच प्रेरणा घेऊन परिसरातील गावात अस्पृष्यांसाठी स्वतंत्र विहिरी तयार झाल्या असे मोरेश्वर गजभिये यांनी सांगितले.शहापूर हे परिसरातील मोठे गाव. परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवासीयांकडून मोठ्या अपेक्षा. परिसरातील आंबेडकरी जनतेला एकत्र आणून बाबासाहेबांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी एक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.१४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी १९४४ रोजी सर्वप्रथम भीमसागर कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १४ जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्म दीक्षा घेतली. त्यानंतर मंदिरातील मूर्ती काढून तेथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली आणि मंदिराचा चेहरामोहरा बदलून त्याचे बौद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही १६ जानेवारी रोजी सायंकाळी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रात्री गीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.शहापूर येथे बाबासाहेबांचे स्वागत१९५४ साली भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे जात होते. वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेबांचे शहापुरला लागलेले पदस्पर्श या भीममेळाव्यासाठी महत्वाची खूणगाठ ठरली. आजही बाबासाहेबांच्या आठवणींना प्रत्येक जण उजाळा देत असतो.१४ ऐवजी १६ जानेवारीला आयोजनशहापूर येथील भीमसागर कार्यक्रमाला नागपुरचे अ‍ॅड.सखारामपंत मेश्राम आले होते. कामठी येथे दरवर्षी १४ जानेवारीलाच भीमसागरचे आयोजन होत असे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रमांना बौद्ध बांधवांना उपस्थित राहणे अडचणीचे होते. म्हणून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी भीमसागर १४ जानेवारी ऐवजी १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावा अशी सूचना केली. तसेच या नावाऐवजी भीममेळावा असे संबोधावे असेही सूचित केले. या सूचनांचे त्यावेळी उपस्थितांनी स्वागत केले आणि दरवर्षी १६ जानेवारीला भीममेळावा होऊ लागला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर