शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे.

ठळक मुद्देआज उसळणार भीमसागर : १९५४ साली बाबासाहेब आंबेडकरांचे शहापुरात झाले होते आगमन

प्रल्हाद हुमणे।लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा शहापूर येथील ऐतिहासिक भीममेळावा म्हणजे आंबेडकरी बांधवांचा वारसा होय. दरवर्षी १६ जानेवारीला आयोजित होणाऱ्या या भीम मेळाव्यामागे रोमहर्षक इतिहास असून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. गुरुवार १६ जानेवारी रोजी आयोजित या भीम मेळाव्याला परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील भीमसागर लोटणार आहे.भंडारा तालुक्यातील शहापूर गावाची नोंद आंबेडकरी इतिहासात स्वर्णाक्षराने लिहिली गेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९४४ साली शहापूरवासीयांनी भीम मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ७६ वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मेळाव्याचे संयोजक मोरेश्वर गजभिये सांगतात, भीम मेळाव्याचा इतिहास रोमहर्षक आणि क्रांतीकारी आहे. १९३८ साली शहापूर गावात रोगाने थैमान घातले होते. त्याला आळा घालण्यासाठी अज्ञानातून एका साधूबाबाला बोलाविले. सूचनेनुसार हवनकुंड बांधण्याचे ठरले. दिवंगत गंगाराम रंगारी यांनी हवनकुंड बांधून दिले. हवनाच्या वेळी रंगारी यांनी हवनकुंडाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्पृष्याच्या हाताने हवनकुंड बाटेल आणि देवीचा कोप होईल म्हणून त्यांना अडविण्यात आले. या प्रकाराने रंगारी व्यथित झाले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांच्यातील स्वाभीमान जागा झाला. आत्माराम गजभिये, जयराम गजभिये, कवडू खोब्रागडे रंगारी यांच्या मदतीला धावले. गावात अस्पृष्य बांधवांची सभा घेतली आणि स्वतंत्र मंदिर बांधण्याची कल्पना आली. लोकवर्गणी आणि श्रमदानातून तेथे मंदिर उभे झाले. विश्वनाथ मंदिर असे त्याचे नामकरण झाले. मंदिराला लागूनच अस्पृष्य कुटुंबातील प्रत्येक दांपत्याला श्रमदानातून तेथे स्वतंत्र विहिर खोदली. हीच प्रेरणा घेऊन परिसरातील गावात अस्पृष्यांसाठी स्वतंत्र विहिरी तयार झाल्या असे मोरेश्वर गजभिये यांनी सांगितले.शहापूर हे परिसरातील मोठे गाव. परिसरातील आंबेडकरी जनतेला शहापूरवासीयांकडून मोठ्या अपेक्षा. परिसरातील आंबेडकरी जनतेला एकत्र आणून बाबासाहेबांच्या कार्याची ओळख पटवून देण्यासाठी एक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.१४ जानेवारीला भीमसागर या नावाने कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार १४ जानेवारी १९४४ रोजी सर्वप्रथम भीमसागर कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर दरवर्षी १४ जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे धम्म दीक्षा घेतली. त्यानंतर मंदिरातील मूर्ती काढून तेथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यात आली आणि मंदिराचा चेहरामोहरा बदलून त्याचे बौद्ध विहार असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर्षीही १६ जानेवारी रोजी सायंकाळी समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रात्री गीत गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.शहापूर येथे बाबासाहेबांचे स्वागत१९५४ साली भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीच्या निमित्ताने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भंडारा येथे जात होते. वाटेत शहापूर येथे कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवून जल्लोषात स्वागत केले. बाबासाहेबांचे शहापुरला लागलेले पदस्पर्श या भीममेळाव्यासाठी महत्वाची खूणगाठ ठरली. आजही बाबासाहेबांच्या आठवणींना प्रत्येक जण उजाळा देत असतो.१४ ऐवजी १६ जानेवारीला आयोजनशहापूर येथील भीमसागर कार्यक्रमाला नागपुरचे अ‍ॅड.सखारामपंत मेश्राम आले होते. कामठी येथे दरवर्षी १४ जानेवारीलाच भीमसागरचे आयोजन होत असे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रमांना बौद्ध बांधवांना उपस्थित राहणे अडचणीचे होते. म्हणून जनतेची गैरसोय टाळण्यासाठी भीमसागर १४ जानेवारी ऐवजी १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावा अशी सूचना केली. तसेच या नावाऐवजी भीममेळावा असे संबोधावे असेही सूचित केले. या सूचनांचे त्यावेळी उपस्थितांनी स्वागत केले आणि दरवर्षी १६ जानेवारीला भीममेळावा होऊ लागला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर