लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत २१० शेतकरी गटातील शेतकऱ्यांना एक हजार ३८१ मेट्रीक टन खते बांधावर पोहोच करण्यात कृषी विभागाला यश आले.भंडारा तालुक्यातील पहेला व भंडारा अंतर्गत विविध शेतकरी गटानी कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोच करण्यात आली. पेरणीपुर्वी शेतकऱ्यांनी करावयाच्या बिज प्रक्रिया तसेच विविध प्रात्याक्षिकांची माहिती देण्यात येत आहे. तालुक्यातील खरबी येथील वाडीभस्मे कृषी केंद्रातून परसोडी व पेवठा येथील भाग्यश्री बचत गटाला बियाणे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी योगेश वासनिक, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, कृषी सहायक रेणुका दराडे, हेमा टिचकुले यांच्या उपस्थितीत पोहोच करण्यात आली. त्यानंतर शहापूर, ठाणा आणी खरबी येथील कृषी केंद्राची पाहणी करुन आढावा घेतला.तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात भंडारा मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी, शहापूर, गणेशपूर, भंडारा, मोहदूरा, खुर्शीपार, साहूली, माटोरा, कोंढी, तर पहेला मंडळ कार्यालयांतर्गत बोरगाव, वाकेश्वर पहेला, भिलेवाडा, आमगाव, मानेगाव, धारगाव, कोका मुख्यालयी शेतकरी गटामार्फत बियाणे पोहोच करण्यात आले आहे.आतापर्यंत १८ शेतकरी गटामार्फत १३५ शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.पेरणीसाठी घाई करु नकाभंडारा तालुक्यात सर्वाधिक धान, सोयाबीन, कापूस पिकाचे क्षेत्र असल्याने शेतकºयांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणीला सुरुवात करु नये, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती बियाण्यांचा वापर करीत बिज प्रक्रिया करावी. पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
भंडारा तालुक्यात १३८१ मेट्रिक टन खत पोहोचले बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST
तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.
भंडारा तालुक्यात १३८१ मेट्रिक टन खत पोहोचले बांधावर
ठळक मुद्देस्वयं बियाण्याची उगवण क्षमता तपासावी : २२५ हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी