शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

भंडारा तालुक्यात १३८१ मेट्रिक टन खत पोहोचले बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:01 IST

तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वयं बियाण्याची उगवण क्षमता तपासावी : २२५ हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीनची पेरणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत २१० शेतकरी गटातील शेतकऱ्यांना एक हजार ३८१ मेट्रीक टन खते बांधावर पोहोच करण्यात कृषी विभागाला यश आले.भंडारा तालुक्यातील पहेला व भंडारा अंतर्गत विविध शेतकरी गटानी कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोच करण्यात आली. पेरणीपुर्वी शेतकऱ्यांनी करावयाच्या बिज प्रक्रिया तसेच विविध प्रात्याक्षिकांची माहिती देण्यात येत आहे. तालुक्यातील खरबी येथील वाडीभस्मे कृषी केंद्रातून परसोडी व पेवठा येथील भाग्यश्री बचत गटाला बियाणे तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतिलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी योगेश वासनिक, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे, कृषी सहायक रेणुका दराडे, हेमा टिचकुले यांच्या उपस्थितीत पोहोच करण्यात आली. त्यानंतर शहापूर, ठाणा आणी खरबी येथील कृषी केंद्राची पाहणी करुन आढावा घेतला.तालुक्यांतर्गत भातपीकाखालील सुमारे २५ हजार ८३२.४९ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड होणार असून सोयाबीन पिकाची २२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसामुळे खते व बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.मृग नक्षत्रातील समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात भंडारा मंडळ कार्यालयांतर्गत परसोडी, शहापूर, गणेशपूर, भंडारा, मोहदूरा, खुर्शीपार, साहूली, माटोरा, कोंढी, तर पहेला मंडळ कार्यालयांतर्गत बोरगाव, वाकेश्वर पहेला, भिलेवाडा, आमगाव, मानेगाव, धारगाव, कोका मुख्यालयी शेतकरी गटामार्फत बियाणे पोहोच करण्यात आले आहे.आतापर्यंत १८ शेतकरी गटामार्फत १३५ शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.पेरणीसाठी घाई करु नकाभंडारा तालुक्यात सर्वाधिक धान, सोयाबीन, कापूस पिकाचे क्षेत्र असल्याने शेतकºयांनी १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणीला सुरुवात करु नये, असे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरगुती बियाण्यांचा वापर करीत बिज प्रक्रिया करावी. पेरणीसाठी घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती