शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

भंडारा रोड रेल्वेस्थानक समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देनवीन गाड्या वाढविण्याची गरज : प्रवाशांना रेल्वेच्या अनियमिततेचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील भंडारा रोड स्थानक जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वात सोयीस्कर आहे. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे.भंडारा रोड रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला वरठी गाव वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. यापैकी प्रवाशांना सर्वाधिक उपयोगी ठरणारा रस्ता भंडारा ते वरठी असून हाच मार्ग प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. हा मार्ग उखडलेला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. भंडारा बसस्थानकापासून रेल्वे स्टेशनपर्यत वेळेवर पोहोचणे प्रवाशांना अनेकदा शक्य होत नाही. याच मार्गाने ऑटोरिक्षा वेगाने धावत असतात. इतर वाहनांची देखील मोठी वर्दळ असते. मोठ्या खड्यांंमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक व्यावसायीकांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटली आहे. अरुंद रसत्यामुळे रेल्वे येते तेव्हा प्रवाशांची गर्दी आणि अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा मोठी धावपळ करावी लागते.पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचलेले असते. त्यातूनच मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक ग्रामपंचायतने कुठलेच प्रयत्न केलेले दिसत नाहीत.वरठी रेल्वेस्थानक ते भंडारा बस बसस्थानकापर्यंत धावधाऱ्या ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपक्षा आधिक प्रवासी बसविले जातात. त्यांचा वेगही अधिका असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही ऑटोरिक्षा चालक प्रवाशांशी हुज्जत घालत असतात. परंतु याकडे पोलीस आणि रेल्वे विभागाचे कायमच दुर्लक्ष दिसून येते. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वेगाड्या नियमित येत नसल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. रेल्वेस्थानक परिसरात अस्ताव्यस्त लागणाºया वाहनांच्या रांगा याचा देखील अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्षरेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत तिकीट विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे एक चौकशी कक्षाची स्थापना करुन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्वक आहे. त्यासोबतच विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी विशेष सुविधा तयार करण्याची गरज आहे. त्याबरोबरच येथे मोबाईल चार्जिंगसारख्या प्राथमिक सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविणे गरजेची आहे.

टॅग्स :railwayरेल्वे