शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

प. बंगालमधून भरकटलेल्या आजारी युवकाला भंडारा पोलिसांनी दिला माणुसकीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:21 IST

पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मात्र नंतर काही कारणास्तव भंडारा जिल्ह्यात भरकटत असलेल्या प. बंगालमधील एका युवकाला त्याचे नातेवाईक येईपर्यंत चार दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देत भंडारा पोलिसांनी आपल्यातील माणुसकीचा सर्वांना परिचय दिला.

ठळक मुद्देचार दिवस केली सेवा इंदुरखा येथील घटना

सिराज शेख।आॅनलाईन लोकमतभंडारा : पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मात्र नंतर काही कारणास्तव भंडारा जिल्ह्यात भरकटत असलेल्या प. बंगालमधील एका युवकाला त्याचे नातेवाईक येईपर्यंत चार दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देत भंडारा पोलिसांनी आपल्यातील माणुसकीचा सर्वांना परिचय दिला.२७ नोव्हेंबरला सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान एक युवक संशयात्मकरित्या इंदुरखा येथे फिरत असल्याचे तेथील पोलीस पाटलांनी मोहाडी पोलिसांना सूचना दिली. अशा प्रकरणात गावकरी चांगलाच चोप देतात हे पोलिसांना चांगले ठाऊक असल्याने एकादी अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस तात्काळ तिथे पोहचले.युवकाला आपल्या ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्याची विचारपूस केली असता त्याला हिंदी किंवा मराठी भाषा बोलता येत नव्हती. तसेच त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी अनेक उपाययोजना करून त्याचा पत्ता काढला असता तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील मयूरेश्वर पोलीस ठाण्यात संपर्क करून त्या युवकाबद्दल माहिती दिली असता त्या युवकाचे नाव अयनुल बारी रा.गोचेपाडा, जिल्हा बिरभुम पश्चिम बंगाल असल्याचे समजले. त्यानंतर व्हाट्सअ‍ॅपच्या व्हीडीओकॉलींगद्वारे त्या युवकाची फोटो त्याच्या नातेवाईकांना दाखविली व त्या युवकाचे संभाषणही करून दिले. त्या युवकाला त्याच्या नातेवाईकांशी भेट करून देण्यासाठी पोलीस निरीक्षक एस.के. चव्हाण, ओमप्रकाश गेडाम, सुनिल केवटसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहयोगाची भूमिका निभावली.चार दिवसाचे आदरातिथ्यच्हा युवक अनेक दिवसापासून उपाशी असल्याने व गावोगाव फिरत असल्याने त्याची मानसिक स्थिती खालावली होती. तो पुणे येथे कामासाठी आला होता. परंतु तेथून पळून जावून इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी त्याला हाकलून न देता त्याच्या परिवाराचा शोध लावण्याचा विचार करून त्याला ठाण्यातच ठेवले. २७ ते ३० नोव्हेंबर पर्यंत त्याच्या राहण्याची व जेवणाची सोय केली. हा पुन्हा येथून पळून न जावो म्हणून त्याची दिवसा, रात्री रखवालीही केली. या चार दिवसात एखादे वेळ जेवणाला उशिर झाला तर तो पोलिसांवरच रागावायचा. त्याचा रागही मोहाडी पोलिसांनी सहन करून पोलिसही शेवटी माणूसच आहेत. त्यांच्यातही संवेदना असतात. परोपकाराची, माणुसकीची भावना असते हे या प्रकरणावरून दाखवून दिले.

टॅग्स :Policeपोलिस