शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

भंडारा हत्याकांड प्रकरण : आणखी चौघांना अटक; दोन्ही गटांत अटकेतील आरोपींची संख्या १४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:52 IST

समेटासाठी आलेल्या अभिषेकने चाकू आणला कशासाठी?

भंडारा : रविवारी रात्री अभिषेक आपल्या मित्रांसह समेटासाठी अमनच्या लस्सी सेंटरवर आला होता. मात्र, समेटासाठी येताना त्याने चाकू आणला कशासाठी, असा नवा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. यामुळे आता अभिषेक आणि त्याच्या सोबत्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, बुधवारी पोलिसांनी पुन्हा दोन्ही गटांमधील चार आरोपींना अटक केली. यात, अमनच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या बा ऊर्फ विष्णू वासनिक आणि विक्की मोगरे या दोघांना अटक केली, तर अभिषेकला मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी मृत अमनचे काका किरण नंदूरकर आणि धीरज नंदूरकर या दोघांना अटक केली आहे. आजच्या कारवाईमुळे या घटनेतील अटक झालेल्या आरोपींची संख्या १४ झाली आहे. काल अटक करण्यात आलेल्या १० जणांना बुधवारी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. त्यांना उद्यापर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

भंडारा हत्याकांड प्रकरण : काकाला थापड मारल्याने अमनला आला होता राग

चाकू जप्त

अमनच्या हत्येसाठी अभिषेकने वापरलेला चाकू पोलिसांनी घटनेच्या दिवशीच जप्त केला आहे. अभिषेकने अमनच्या उजव्या कुशीखाली एकच वार केला होता. तो बराच खोलवर असल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला होता. तो चाकू अभिषेकचाच असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी वाढण्याची शक्यता

या घटनेतील आरोपींची संख्या १४ झाली असली तरी ही संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांनी सांगितले. या घटनेचा तपास अधिक बारकाईने केला जात असून, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा