शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भंडारा : पाणी टंचाईग्रस्त ३४० गावांत होणार सव्वा तीन कोटींचा खर्च !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:44 IST

जिल्ह्यात ४७२ कामे : जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावित आराखडा

देवानंद नंदेश्वर

भंडारा : उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून पिण्याच्या पाण्याची अनेक गावात मार्च महिन्यांपासून टंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी यंदा कृती आराखडा तयार झालेला असला तरी प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. ३४० गावांत ४७२ कामे होणार असून त्यावर ३ कोटी २३ लाख ५६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यावर्षी अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला असून त्यांची पातळी निम्म्यावर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. केंद्र सरकारच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या मागणीनुसार उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढील सहा ते सात महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. जिल्ह्यात संभाव्य स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील ३४० गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याचे दिसत आहे. भंडारा जलसंकट निर्माण होते. भंडारा तालुक्याला वैनगंगा नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. जिल्हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु शहरातील काही वसाहतींमध्ये टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो. 

जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्जएप्रिल ते जून २०२४ पर्यंत पाणी टंचाईचा प्रस्तावित कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला. यात नळयोजना दुरुस्तीची ३५ कामे खर्च ७० लाख, विंधन विहिरी ११७ कामे खर्च १७५.५०, कुपनलिकांची ७ कामे खर्च ११ लाख ९० हजार, विंधन विहिर दुरुस्ती २५६ कामे खर्च ४० लाख ९० हजार, सार्वजनिक विहिरींचे खोदकाम ५३ कामे खर्च २१ लाख २० हजार, खासगी विहिर अधिग्रहण संख्या चार खर्च लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

खर्चाचे अंदाजपत्रक वाढले२०२२-२०२३ मध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत १४० उपाययोजनांवर ८४ लाख २७ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला होता. यात भंडारा २५, साकोली २६, लाखनी १४, मोहाडी २०, तुमसर २६. पवनी १४, लाखांदूर ९ अशा तालुकानिहाय गावांचा समावेश होता. दरम्यान यंदा पर्जन्यमानातील घट व जलसाठ्यातील टंचाईमुळे उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपाययोजनांसाठीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी