शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

प्राचीन काळापासून भंडारा जिल्हा बौद्धमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते.

ठळक मुद्देधम्मचारी पदमबोधी : सिल्ली येथील मिनीदीक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमीलाच वंदन न करता संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या भूमीला वंदन करणे गरजेचे आहे. मिनी दीक्षाभूमीच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्हा हा प्राचीन काळापासूनच बौद्धमय असून, बुद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. करीता भंडारा जिल्हा हा पुजनिय आहे, असे प्रतिपादन धम्मचारी पदमबोधी यांनी केले.भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील बुध्द विहार समितीच्या वतीने मिनीदिक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदशक म्हणून ते बोलत होते.५ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंडाराचे माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, तर अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मचारी पदमबोधी व प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गुलशन गजभिये, सिल्लीचे सरपंच निर्भय क्षीरसागर, डॉ. विनोद भोयर, प्राध्यापक नागसेन, बावनकर, कास्ट्राईबचे महासंघटक सुर्यकांत हुमणे, विनोद विद्यालयाचे प्राचार्य अनमोल देशपांडे, ज्येष्ठ नागरिक देवराम बन्सोड, बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, सचिव सामंत सुखदेवे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू तथागत गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले अहिंसक व शांततेचे दूत होते. त्यांच्या या गुरूमुळे स्वातंत्र, समता व बंधुता यांच्या जोरावर त्यांनी या बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. देव, दैववाद झुगारल्याशिवाय आपण आंबेडकरवाद स्वीकारू शकत नाही. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या विचारांवर चालून स्वत:ला प्रकाशित करा व माणसाला माणूस समजूनच वागणूक द्या. डॉ. बाबासाहेबांच्या वाटचालीत माता रमाईने दिलेला मोलाचा वाटा व केलेला त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. माई रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडलेच नसते, असे त्यांनी नमूद केले.प्रास्ताविक संदीप गजभिये, संचालन विलास खोब्रागडे, आभार प्रदर्शन विनोद विद्यालय सिल्लीचे प्राचार्य अनमोल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सिल्ली येथील बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, उपाध्यक्ष चंद्रमनी सरादे, सचीव सामंत सुखदेवे, सहसचिव प्रमोद बन्सोड आदींनी सहकार्य केले.