शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

प्राचीन काळापासून भंडारा जिल्हा बौद्धमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते.

ठळक मुद्देधम्मचारी पदमबोधी : सिल्ली येथील मिनीदीक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमीलाच वंदन न करता संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या भूमीला वंदन करणे गरजेचे आहे. मिनी दीक्षाभूमीच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्हा हा प्राचीन काळापासूनच बौद्धमय असून, बुद्धभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. करीता भंडारा जिल्हा हा पुजनिय आहे, असे प्रतिपादन धम्मचारी पदमबोधी यांनी केले.भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील बुध्द विहार समितीच्या वतीने मिनीदिक्षाभूमीच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदशक म्हणून ते बोलत होते.५ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंडाराचे माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, तर अध्यक्षस्थानी अमृत बन्सोड उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मचारी पदमबोधी व प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गुलशन गजभिये, सिल्लीचे सरपंच निर्भय क्षीरसागर, डॉ. विनोद भोयर, प्राध्यापक नागसेन, बावनकर, कास्ट्राईबचे महासंघटक सुर्यकांत हुमणे, विनोद विद्यालयाचे प्राचार्य अनमोल देशपांडे, ज्येष्ठ नागरिक देवराम बन्सोड, बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, सचिव सामंत सुखदेवे आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सिल्ली येथील पुंडलिकराव तिरपुडे यांना त्यांच्या मरणोत्तर सन्मानचिन्ह देण्यात आले. सदर सन्मानचिन्ह त्यांचे भाऊ वासुदेव तिरपुडे यांनी स्वीकारला. धम्मचारी पदमबोधी म्हणाले, सिल्ली येथील मिनी दिक्षाभूमीची दखल सर्वांना घेणे गरजेचे आहे. कारण गत सहा वर्षापासून हा परीसर आजही पहिल्याप्रमाणेच स्वच्छ दिसत असल्याने येथील समाजाची एकजूट यावरून दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू तथागत गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले अहिंसक व शांततेचे दूत होते. त्यांच्या या गुरूमुळे स्वातंत्र, समता व बंधुता यांच्या जोरावर त्यांनी या बहुजन समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. देव, दैववाद झुगारल्याशिवाय आपण आंबेडकरवाद स्वीकारू शकत नाही. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांच्या विचारांवर चालून स्वत:ला प्रकाशित करा व माणसाला माणूस समजूनच वागणूक द्या. डॉ. बाबासाहेबांच्या वाटचालीत माता रमाईने दिलेला मोलाचा वाटा व केलेला त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. माई रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडलेच नसते, असे त्यांनी नमूद केले.प्रास्ताविक संदीप गजभिये, संचालन विलास खोब्रागडे, आभार प्रदर्शन विनोद विद्यालय सिल्लीचे प्राचार्य अनमोल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सिल्ली येथील बुध्द विहार समितीचे अध्यक्ष अंबादास गजभिये, उपाध्यक्ष चंद्रमनी सरादे, सचीव सामंत सुखदेवे, सहसचिव प्रमोद बन्सोड आदींनी सहकार्य केले.