शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Bhandara: कृषी विभागात ४३५ पैकी २०० पदे रिक्त; कसे होणार शेतकऱ्यांचे भले? जिल्ह्यात २३५ मनुष्यबळावर सुरू आहे कृषी विभागाचे कामकाज

By युवराज गोमास | Updated: June 12, 2023 19:15 IST

Bhandara: शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहे.

- युवराज गोमासेभंडारा -  शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक प्रयोगशिल शेती पद्धतीने धडे मिळावे, वेळोवेळी प्रत्यक्ष शेतशिवारात मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी विभागाची भूमिका मोठी असते. परंतु, जिल्ह्यातील कृषी विभाग (राज्यस्तरीय) मनुष्यबळाअभावी मजबुरीचे जीवन जगत आहे.विभागात मंजूर ४३५ पदांपैकी केवळ २३५ पदे भरलेली असून २०० पदे रिक्त आहेत. परिणामी कसे होणार शेतकऱ्यांचे भले, असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भंडारा जिल्हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील जवळपास ६५ टक्के नागरिक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना व प्रंकल्पांचे संचालन केले जाते. योजनांचा थेट लाभ दिला जातो. नवे तंत्र व आधुनिक बदलांसबंंधी प्रयोगशिल प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन दिले जातात. परंतु, या विभागात रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला आहे. प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे २०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाचा नाथ कुणी नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गट 'अ' व 'ब' ची १७ पदे रिक्तगट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची ५ पदांपैकी ४ पदे रिक्त आहेत. नुकतेच अधिक्षक कृषी अधिकाऱ्याचे पद भरले गेले आहे. कृषी उपसंचालकाची ४ पैकी ४ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील १७ पैकी ९ पदे रिक्त आहेत. गट ब प्रवर्गातील कनिष्ठ अधिकाऱ्यांची २३ पैकी २ पदे तर सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱी व लेखा अधिकाऱ्यांची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. एकूण ४२ पैकी २९ पदे भरलेली असून १३ पदे रिक्त आहेत.

गट 'क' प्रवर्गातील १२९ जागा रिक्तगट क प्रवर्गातील कृषी पर्यवेक्षकांच्या मंजूर ४३ पैकी ४१ पदे भरलेली असून २ जागा रिक्त आहेत. यात कृषी सहाय्यकांची ७१ पदे रिक्त आहेत. लघुलेखक निम्नक्षेणी व अधीक्षकाची प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. सहाय्यक अधीक्षकाची एक तर कनिष्ठ लिपीकांच्या ७ जागा रिक्त आहेत. आरेखक एक, अनुरेखकाच्या ३३ तर वाहन चालकांच्या ११ जागा रिक्त आहेत.

गट 'ड' प्रवर्गातील ५४ पदे रिक्तया प्रवर्गातील ७० पैकी १६ जागा भरलेल्सा असून ५४ जागा रिक्त आहेत. यात रोपमळा मदनिसांच्या ६, शिपायांच्या ४० जागा रिक्त आहेत. तालुका बीजगुणन केंद्रातील मजुरांच्या ८ जागा रिक्त आहेत.

सुट्टीच्या दिवशीही कामकाजकामे प्रलंबीत राहू नयेत म्हणून अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात कामकाज करतात. शनिवार व रविवारलाही कामात व्यस्त असतात. रिक्त पदांमुळे शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.

एका सहाय्यकाकडे तीन साज्यांचा प्रभारथेट योजनांवर काम व प्रकल्पांचे संचालन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सहाय्यक करतात. परंतु रिक्त पदांमुळे दोन ते तीन साज्यांचा प्रभार सांभाळतांना त्यांची दमछाक होते.

रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढत असला तरी शेतकऱ्यांसाठी लोकोपयोगी कामे करावीच लागतात. शासनाने रिक्त पदांचा भरणा केल्यास कामकाज चालविणे सोयीचे हाेईल. - संगिता माने, अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र