श्रीमद भागवत कथा : परमानंद महाराज यांचे प्रतिपादनसाकोली : भागवत हे सत्य बोलण्यास शिकविणारे शिक्षण देते. अन्य धार्मिक ग्रंथात अग्रपुजेचे मान असलेल्या देवतांचे मंगलाचरण असते. पण भागवत ग्रंथात पहिल्याच श्लोकात सत्याची वंदना आहे. सत्य भवती, ज्ञान, वंदना आहे. सत्य, भवती, ज्ञान, वैराग्य, त्याग, आल्यास जीवन भागवतमय होते. घरातील संस्कार व सत्संगाशिवाय कुठलीही चांगली गोष्ट अंगीकारली जात नाही. अन्यथा जीवन व्यर्थ जाते. असे प्रतिपादन बाल व्यास पंडीत परमानंद महाराज यांनी संत लहरीबाबा यांच्या ९८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सप्ताहादरम्यान केले. भागवत कृपा ही सर्व शिकवण देणारी मुक्ती मोक्ष प्रदान करणारी कथा आहे. त्याचे श्रावण भक्ती व आनंद ठेवून करावे. मनोरंजनाच्या दृष्टीकोणातून ऐकू नये. जगात सर्वच दुखी आहेत. परंतु श्रद्धेने भागवत ऐकून त्याचे आचरण करणारे भक्त मात्र सर्वत्र सुखी होतात. त्यांना कशाचेही मोह राहत नाही.गंगेत बुडी मारून शुद्ध होतात. पण त्यात बुडाले तर भरून जातो. पण भागवत ज्ञान गंगेत बुडाले तर जीवन सार्थकी होते. असेही त्यांनी धुंधकाळीची कथा सांगताना सांगितले. संगीतमय भागवत कथेचा शुभारंभ ग्रंथ पुजनाने झाली. कथा व्यवस्थापक श्री रामबालकदासंजीनी उद्देश कथन केला. या दहा दिवसीय संगीत भागवत कथा पुराणाच्या कार्यक्रमासाठी लहरीबाबा उत्सव समितीचे अशोक गुप्ता, गंगासागर गुप्ता, परसराम गुप्ता, प्रभाकर सपाटे, भरत बावनकर, अनंत ईलमे, मोहन गुप्ता, विजय टिकेकर, किशोर तिडके, प्रदीप मासूरकर, पुंडलीक कवासे, विजय शेंडे व ट्रस्टचे सर्व विश्वस्त कार्यरत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
भागवत हे सत्य बोलण्यास शिकविते
By admin | Updated: January 7, 2015 22:48 IST