शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लाभार्थ्यांना ३ महिन्यांचे रेशन मिळणार एकाच वेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:35 IST

पूरबाधित गावांना प्राधान्य : जूनमध्येच वितरित होणार रेशन धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. अतिवृष्टी, महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत रेशन पुरवठ्यात अडथळा येऊ नये म्हणून शासनाने तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांना पुरवठासुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे.

जिल्ह्यात १५४ गावे नदीकाठावर असून १३० गावे दरवर्षी नदी व नाल्यांमुळे बाधित होतात. तालुका, जिल्हा मुख्यालयाशी नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आठवडाभर गावातच राहावे लागते. काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. हा धोका ओळखून ग्रामीण भागात पावसाळ्यातील तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात धान्य पोहोचविण्याचे काम सुरू झालेले आहे. काही तालुक्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान पोहोचवून वाटपही सुरू केलेले आहे. यामुळे आपदेवेळी उडणारी तारांबळ थांबणार आहे. 

दुकानदार तीन महिन्यांचे धान्य कुठे ठेवणार?जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे जवळपास दोन महिन्यांचा धान्यसाठा करण्याची व्यवस्था आहे. बहुतांश दुकानदारांकडे हीसुद्धा व्यवस्था नाही. केवळ एका महिन्याचे ते धान्य साठवून ठेवू शकतात. मात्र, आता तीन महिन्यांचे धान्य प्राप्त होत असल्याने ते धान्य कोठे ठेवावे, असा प्रश्न आहे.

३० तारखेच्या आत धान्याची उचल करातीन महिन्यांच्या स्वस्त धान्याची उचल करण्यासाठी जिल्ह्यातील रेशन ग्राहकांना ३० जूनच्या आत स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची उचल करावी लागणार आहे. 

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून...लाभार्थ्यांना अतिवृष्टी, पूरस्थितीत धान्याची उचल करताना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे.

"पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांची पूरपरिस्थितीमुळे अडचण होऊ नये, यादृष्टीने शासनाने जून महिन्यातच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुकानदाराकडे धान्य पुरविण्यात आले आहे."- नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडारा