शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गोंडीटोलाचे लाभार्थी घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवारा बाराखडीत गुंफून ठेवला आहे. अ, ब, क, ड अशा या याद्या आहेत. या यादीत असणारी नावे क्रमवारीनुसार मंजूर केली जात आहे.

ठळक मुद्देजीर्ण घरात वास्तव्य : आयुष्याच्या वळणावर प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : घरकूलाचे यादीत नावे असताना अद्याप घरकूल मंजूर झाले नाही. गोंडीटोला येथील लाभार्थ्यांना जीर्ण पडक्या घरात वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. बाराखडीत आयुष्याचे वळण अडले असल्याचा आरोप लाभार्थी करीत आहेत.ग्रामीण भागात घरकूल मंजुरीचा वाढता अनुशेष आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान देयकावर योजनेचे भवितव्य अवलंबून आहे. एकाने अनुदान अडविला तर दुसरा फक्त टोलवेबाजी पर्यंत सीमीत राहत. यात मात्र गरीब घरकूल लाभार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने आयुष्याचा निवारा बाराखडीत गुंफून ठेवला आहे. अ, ब, क, ड अशा या याद्या आहेत. या यादीत असणारी नावे क्रमवारीनुसार मंजूर केली जात आहे. या यादी नुसार मंजुरी मिळताना घरकुलाचे प्रतिक्षेत अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. प्रतिक्षा यादीत क्रमवारीनुसार घरकुलाचे यादीला मंजुरी देताना सर्वेक्षण नुसार आणि गरजू लाभार्थ्यांचा विचार करण्यात येत नाही. यामुळे जीर्ण आणि पडक्या घरात त्यांना वास्तव्य करावे लागत आहे. गोंडीटोला या दीड हजार लोकवस्तीच्या गावात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत अनु. जाती व रमाई आवास योजना अंतर्गत अनु. जाती प्रवर्गात असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रवर्गात असणारा अनुशेष अंतिम टप्प्यात असला तरी अन्य प्रवर्गातील गरीबांचा अनुशेष वाढता आहे.या गावातील सुनील राऊत, अनिल राऊत, कलाबाई राऊत, कुवरलाल राऊत हे कुटुंब अंत्योदय यादीत जीवन जगत आहेत. गावात मोलमजुरी करणे त्यांचा व्यवसाय आहे. शेती नाही, घरातील परिस्थिती अत् यंत हलाखीची असून घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. रोजगार आणि शिक्षणाचा अभाव आहे. राऊत कुटुंबियांनी रितसर ग्रामपंचायतकडे घरकूलाकरिता नावे दिली आहेत. त्यांचे नावांची नोंद करण्यात आली आहे. परंतु क्रमवारीनुसार त्यांचा नंबर आलेला नाही. यामुळे घरकूल मंजूर झाले नाही. त्यांचा अनेक वर्षापासून घरकूल करिता संघर्ष सुरु आहे. परंतु त्यांचे संघर्षाला अपयश आले आहे. अती गरजू असताना त्यांचे नाव मंजुरीला प्रथम प्राथमिकता दिली जात नाही. यामुळे जीर्ण आणि पडक्या घरात त्यांचे वास्तव्य आहे.ग्रामपंचायतने त्यांचे नाव पाठविले आहे. यामुळे शासन अंतर्गत मंजुरी नंतर त्यांना घरकूल मिळणार असले तरी अती गरजू निकषानुसार राऊत कुटुबियांना घरकूल देण्याची गरज आहे. घरकूल अभावी त्यांचे जीव जीर्ण घरात धोक्यात आले आहे.रमाई आवास योजनेचे अनुदान अडलेअनु. जाती नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता रमाई आवास योजना राबविण्यात आली आहे. या घरकूल योजनेचा अनुदान ऐन पावसाळ्यात देण्यात आला नाही. यामुळे घरकुलांना ताडपत्रीचे आच्छादन देऊन वेळ मारून नेली जात आहे. आधीच गरीब असणाºया लाभार्थ्यांचा निधी अभावी धांदल उडत आहे. अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याकरिता तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी चुल्हाडचे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शामकुवर यांनी केली आहे.राऊत कुटुंब पात्र लाभार्थी असताना त्यांना गती गरजू अंतर्गत घरकूल मंजूर करण्याची आवश्यकता आहे.-संजय राऊत, सदस्य ग्रामपंचायत गोंडीटोलापावसाळा असल्याने घरकुलांचे उर्वरीत अनुदान जलद गतीने दिले पाहिजे. या शिवाय गरजू नावाचा विचार करून त्यांना घरकूल देण्याची गरज आहे.-किशोर राहांगडाले, बिनाखी 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना