शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील बावडी झाली कचराकुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 17:35 IST

सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही.

ठळक मुद्दे६० पायऱ्यांची बावडी : पुरातत्व विभागात नोंदच नाही

संजय साठवणे

साकोली (भंडारा) : भोसले कालीन सानगडीच्या ऐतिहासिक किल्ल्यातील दोन बावडी (पायरीची विहीर) अखेरच्या घटका मोजत असून पाण्यासाठी वापर होत नसल्याने या बावडीत आता केरकचरा फेकला जातो. परिसरात झुडपी वनस्पती वाढल्याने किल्ल्यासह येथील प्राचीन वास्तूला धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही.

साकोली तालुक्यातील सानगडी हे प्राचीन गाव. भोसले कालीन सहानगड म्हणजे आजचे सानगडी. याठिकाणी किल्ला असून दोन पायऱ्याच्या विहिरी अर्थात बावडी आहेत. एक बावडी सुस्थितीत असली तरी दुसरी मात्र लोकांनी कचराकुंडी केली आहे. ही बावडी केवळ जलस्त्रोतच नव्हे तर स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. बांधकाम केवळ दगड चुन्याने केले आहे. मात्र आता या वास्तूची दुरवस्था झाली आहे.

सानगडी येथील ऐतिहासिक किल्ला आणि बावडीची व इतर मंदिरांची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाही. या वास्तूची नोंद करण्यात यावी म्हणून अनेकदा पुरातत्व विभाग, राज्य सरकार व लोकप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार केला. परंतु अद्यापही ही वास्तू राज्य संरक्षित झाली नाही.

अशी आहे प्राचीन बावडी

सानगडीच्या किल्ल्यामध्ये दोन प्राचीन बावडी आहे. या विहिरीचे बांधकाम दगड आणि चुन्यात करण्यात आले. बावडीत उतरण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या असून आतील भागात दोन मोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये युद्धाच्या वेळेस भोसले कालीन लोक मुक्कामाने राहत होते. आत गेल्यानंतर खोल गर्तेत थंडगार पाणी असते. ते कधीही आटत नाही. परंतु आता याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.

उंच टेकडीवर सानगडीचा किल्ला

सानगडी येथील उंच टेकडीवर २ हेक्टर ४३ आर मध्ये हा किल्ला आहे. नागपूरच्या रघुजी राजे भोसले यांनी १७३४ मध्ये हा किल्ला बांधला. गोंडराजा भक्त बुलंदशहा नंतर त्यांचा मुलगा चांद सुलतान गादीवर बसला. त्यांच्या मृत्यूनंतर वलीशाह नावाच्या दासी पुत्राने त्यावर कब्जा केला. तेव्हा चांद सुलतानच्या पत्नीने मदतीसाठी वऱ्हाडातून रघुजी राजे यांना पाचारण केले. रघुजीने युद्ध करून वलीशहाला पराजित केले. त्यावेळेस सानगडी विभागात राजा खानचा पुत्र मोहम्मद खान शासन करीत होता. त्याला रघुजी राजाने शिवनी प्रांतात दिवाण म्हणून पाठविले व स्वत: सानगडी ते प्रतापगड विभागावर सत्ता स्थापित केली.

टॅग्स :historyइतिहासArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणSocialसामाजिकsakoli-acसाकोली