शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

बावनथडी प्रकल्प वितरिकांचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. ...

तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सिंचन करणाऱ्या वितरिका शेतकऱ्यासाठी वरदान ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरल्या आहेत. माडगी शिवारात एका आठवड्यापूर्वी फुटलेल्या वितरिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वितरिकांचे अस्तरीकरण अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही. वितरिकांची दुरवस्था झाली आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेल्या भावंडे प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. आंतरराज्य प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मागील चार ते पाच वर्षांपासून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळी व उन्हाळी धान पिकाकरिता या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, परंतु अनेक ठिकाणी वितरिका फुटल्या असून, काही वितरिकांना भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तेथे मोठे नुकसान होते. पिके वाहून जातात, पाण्याचा अपव्यय होतो. मुख्य कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले, परंतु लहान वितरिकांचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी करण्यात आले नाहीत. त्यामुळे वितरिकांना भेगा पडतात. सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, वितरिकांना भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुमारे २९ हजार हेक्टर शेती सिंचनाचे लक्ष या प्रकल्पातून करण्यात आले आहे. वास्तविक, २७ हजार हेक्टर शेत जमिनीचे सिंचन प्रत्यक्ष करण्यात येत आहे. बाह्मणी शिवनी शिवारातील काही शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. बैलपर्यंत पाणी जात नसल्याची माहिती आहे. मार्गी शिवारात आठ दिवसांपूर्वी फुटलेल्या वितरिकेतून पाण्याचा विसर्ग केल्याने शेती जलमग्न झाली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे येथे नुकसान झाले. वितरिका दुरुस्तीकरिता सुमारे पन्नास कोटींचा निधी पुन्हा या प्रकल्पाला देण्याची गरज आहे. या आंतरराज्य प्रकल्पच्या जास्त लाभ मध्य प्रदेशाला होत असून, महाराष्ट्राला त्या मानाने कमी लाभ होत आहे. बावनथडीचे उपकालवे व वितरिका तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.