शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्प वितरिकांचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. ...

तुमसर: महत्त्वाकांशी आंतरराज्य बावांथाडी प्रकल्प पूर्णत्वास आला, परंतु येथील वितरिका कुठे फुटल्या आहेत, तर कुठे भगदाड पडले आहे. त्यामुळे सिंचन करणाऱ्या वितरिका शेतकऱ्यासाठी वरदान ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरल्या आहेत. माडगी शिवारात एका आठवड्यापूर्वी फुटलेल्या वितरिकेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वितरिकांचे अस्तरीकरण अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही. वितरिकांची दुरवस्था झाली आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेल्या भावंडे प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले आहे. आंतरराज्य प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मागील चार ते पाच वर्षांपासून प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळी व उन्हाळी धान पिकाकरिता या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, परंतु अनेक ठिकाणी वितरिका फुटल्या असून, काही वितरिकांना भगदाड पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तेथे मोठे नुकसान होते. पिके वाहून जातात, पाण्याचा अपव्यय होतो. मुख्य कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले, परंतु लहान वितरिकांचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी करण्यात आले नाहीत. त्यामुळे वितरिकांना भेगा पडतात. सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, वितरिकांना भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुमारे २९ हजार हेक्टर शेती सिंचनाचे लक्ष या प्रकल्पातून करण्यात आले आहे. वास्तविक, २७ हजार हेक्टर शेत जमिनीचे सिंचन प्रत्यक्ष करण्यात येत आहे. बाह्मणी शिवनी शिवारातील काही शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाही. बैलपर्यंत पाणी जात नसल्याची माहिती आहे. मार्गी शिवारात आठ दिवसांपूर्वी फुटलेल्या वितरिकेतून पाण्याचा विसर्ग केल्याने शेती जलमग्न झाली होती. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे येथे नुकसान झाले. वितरिका दुरुस्तीकरिता सुमारे पन्नास कोटींचा निधी पुन्हा या प्रकल्पाला देण्याची गरज आहे. या आंतरराज्य प्रकल्पच्या जास्त लाभ मध्य प्रदेशाला होत असून, महाराष्ट्राला त्या मानाने कमी लाभ होत आहे. बावनथडीचे उपकालवे व वितरिका तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.