शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर बंदी घाला

By admin | Updated: February 20, 2015 00:34 IST

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे.

भंडारा : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य शासन तंबाखूबंदीच्या मोहीमेवर गांभीर्याने विचार करीत आहे. उशिरा का असेना शासनाला जाग आली. आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी तंबाखूमुक्तीसंदर्भात मोहीम राबविण्याची तयारी सुरु केली आहे. तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहचत असतानाही, कित्येक जीव यमलोकी गेल्यावरही तंबाखूचे सेवन आजही मोठ्या प्रमाणात केले जाते. तंबाखू, गुटखा, पानमसाला, नस या सर्वांचा वापरामुळे मानवी शरीराला धोका असताना व ती बाब माहित असतानाही ते कृत्य वारंवार केले जात असल्यामुळे तंबाखू सेवन ही एक मनोविकृती आहे. त्यामुळे तंबाखू बंदी झालीच पाहिजे, या राज्य शासनाच्या भूमिकेला शहरातील नामवंत डॉक्टरांनी लोकमतच्या चर्चासत्रातून शंभर टक्के पाठींबा दिला. तंबाखू हे हृदयासाठी विषतंबाखूचा सर्वात पहिला परिणाम हा मानवी हृदयाला होत असतो. तंबाखू हे मानवी हृदयासाठी विष आहे. दारू व तंबाखू सेवन करणाऱ्या इसमांना हे तर अत्यंत घातक आहे. तोंडाचा, पोटाचा व अन्ननलिकेचा कर्करोग तंबाखूमुळे होत असतो. तसेच अन्य आजारही या एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे होत असते. तंबाखू मुक्ती झाली तर आपोआप हृदयाचे आजार कमी होतील.-डॉ. नितीन तुरस्करजनरल फिजीशियनतंबाखूचे सेवन म्हणजे शरीरासाठी धोक्याची सूचनातंबाखुच्या सेवनामुळे मुख रोगाचा कर्करोग होतो. हळूहळू तो पसरून फुफफुस व पोटाच्या कॅन्सरलाही कारणीभूत ठरतो. दुसरीकडे सिगारेट, विडी यापासून निघणाऱ्या धुरामुळे 'एलर्जीक प्राब्लेम' निर्माण होतात. त्यामुळे तंबाखुचे सेवन हे शरीरासाठी धोक्याची सूचना आहे. तंबाखू बंदी झालीच पाहिजे. तंबाखूमुळे मृत्यू होत असताना नागरिकही जागरुक का होत नाही यावरही विचारमंथन होणे गरजेचे आहे.-डॉ. मनोज चव्हाणहृदयरोग तज्ज्ञदर दिवसाला आढळतो एक कर्करूग्णमाझ्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी तपासाअंती एकाला तरी कर्करोगाची लागण झाल्याचे निष्पन्न होते. एकट्या तंबाखू सेवनाचा हा दुष्परिणाम आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. गुटखा खाणे हे ‘कॉमन’ झाल्याने कर्करोगाचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहे. तंबाखू बंदीची घोषणा फार पुर्वीच व्हायला हवी होती. उशिरा का असेना शासनाने आगामी दिवसात तंबाखू मुक्तीची आखलेली मोहिम शंभर टक्के यशस्वी झालीच पाहिजे. -डॉ. प्रमोद धुर्वेकान, नाक, घसा तज्ज्ञतंबाखू बंदी झालीच पाहिजेराज्य शासनाने तंबाखू बंदीसंदर्भात भविष्यकालीन कायदा अंमलात आणण्यासंदर्भात जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. तंबाखूवर बंदी आणलीच पाहिजे, तंबाखू, सिगारेट, नस व आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे व समाजात जनजागृती करणे यासाठी २६ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे. इंडियन डेंटल असोसिएशनच्या जवळपास आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही या मोहिमेला आपला पाठिंबा दिला आहे. ज्या तंबाखुच्या सेवनाने शरीराला इजा होते त्यावर बंदी आणलीच पाहिजे.-डॉ. मनिष बत्रादंत रोग तज्ज्ञतंबाखुमुळे हाडे होतात ठिसूळतंबाखुमध्ये निकोटीन हा पदार्थ असल्यामुळे शरीराला त्याची गरज भासत जाते. परिणामी मानसीक दृष्ट्या संबंधित इसम दिवसेंगणिक तंबाखुचे सेवन करतच जातो. कर्करोग तर होतोच मात्र शरीरातील हाडेही ठिसूळ होत जातात. ही बाब फार उशिरा लक्षात येते. तोपर्यंत तंबाखू सेवन करणारा मृत्युच्या उंबरठ्यावर असतो. त्यामुळे तंबाखू आणि दारूच्या सेवनावर बंदी झाली पाहिजे.-डॉ. गोपाल व्यासअस्थिरोग तज्ज्ञसवय बदलने गरजेचे तंबाखूचे सेवन ही एक सवय आहे. तंबाखुमध्ये असणाऱ्या निकोटीनमुळे तंबाखुचे सेवन नियमित करावे, अशी सवय त्या इसमाला लागलेली असते. यासाठी स्वत:हून बदल घडविणे गरजेचे आहे. जनजागृती आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर तंबाखू सेवनाची सवय बंद होवू शकते. या मोहिमेला घरापासूनच सुरूवात करावी लागेल.-डॉ. मिलिंद देशकरअस्थिरोग तज्ज्ञआई-वडिलांची जबाबदारी अत्यंत महत्वाचीलहान मुलेही जेव्हा गुटख्यामधील सुपारी मागतात, तेव्हा तंबाखुचे सेवन या स्तरापर्यंत येवून पोहचले आहे, याचे गांभीर्य कळते. लहान मुलेही गुटखा खात असल्याने त्यांना एॅसिडीटी, अल्सर व आतड्यांवर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण जाणवते. दिवसेंगणिक या प्रकाराचे रुग्णही एकट्या तंबाखुच्या सेवनामुळे आढळून येत आहेत. यासाठी आई-वडिलांचीही जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. तंबाखू मुक्तीच झालीच पाहिजे याचा मनापासून निर्धार करणे महत्वाचे असून याची सुरूवात स्वत:पासून झाली पाहिजे.-डॉ. पराग डहाके.बालरोग तज्ज्ञशरीराच्या सर्वांगीण विकासावर विपरित परिणामतंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील अवयव निकामी होत जातात. प्राथमिक अवस्थेत कर्करोग आहे किंवा नाही याचे निदानच होत नाही. निदान झाल्यावर खूप उशिर झालेला असतो. ज्या तंबाखूच्या सेवनामुळे माणसाला जीवन गमवावे लागते, तरीही त्याचे सेवन करणे बंद होत नाही. ही खरच लाजीरवाणी गोष्ट आहे. दुसरीकडे तंबाखूच्या सेवनामुळे शरीराचा सर्वांगीण विकास खोळंबत असतो. यावर जनजागृती झालीच पाहिजे.- डॉ.यशवंत लांजेवारबालरोग तज्ज्ञ