शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

भाजी व्यापाऱ्यांचे ‘बीटीबी’ विरूद्ध बंड

By admin | Updated: October 4, 2016 00:30 IST

जलशुद्धीकरण केंद्राजवळ महिला व बाल रूग्णालयाला नाकारून पालिकेने ही जागा भाजी बाजारासाठी दिली.

निषेध नोंदविला : पालिकेने दिली १ लाखात दीड एकर जागाभंडारा : जलशुद्धीकरण केंद्राजवळ महिला व बाल रूग्णालयाला नाकारून पालिकेने ही जागा भाजी बाजारासाठी दिली. ही जागा महिला रूग्णालयाला पाहिजे, या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने केल्यानंतरही ‘बीटीबी’ नामक कंपनीने १० दिवसांपूर्वी या जागेवर थोक भाजी बाजार सुरू केला होता. दरम्यान, भाजी बाजाराचा प्रमुखाविरूद्ध बंड पुकारात संतप्त भाजी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मोठा बाजार या जुन्या ठिकाणी नेली. १० दिवसांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या भाजी मंडीत व्यापाऱ्यांनी दुकाने लावली होती. दरम्यान रविवारला दुकानाचे फलक व साहित्य काढले. तत्पुर्वी या व्यापाऱ्यांनी बीटीबी बाजारासमोर फटाके फोडून व ढोलताशा वाजवून जुन्याच ठिकाणी साहित्य हलविले.महात्मा फुले भाजी विक्रेता असोशिएशनच्यावतीने मोठा बाजार चौकात बाजार भरत होता. येथील ठोक भाजी विक्रेत्यांकडे जागा नसल्यामुळे त्यांनी पर्यायी पालिकेला जागेची मागणी केली होती. त्यावेळी बंडू बारापात्रे यांनी भाजी विक्रेत्यांच्या संमतीने भंडारा येथील शीट क्रमांक ५४, प्लॉट क्र.२०/४ मधील १.५० एकर जागेत बीटीबी नामक ठोक भाजी व्यापार सुरू केला. तेव्हापासूनच ही जागा वादग्रस्त ठरली. या बाजारात १० दिवसांपूर्वी ४० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. पाच दिवस बाजार सुरळीत चालल्यानंतर ‘बीटीबी’ कंपनीचे बंडू बारापात्रे यांनी नेमलेल्या माणसांकडून भाजी व्यापाऱ्यांना दमदाटी करू लागले. त्यामुळे सर्व व्यापारी एकत्र येऊन ‘बीटीबी’ या कंपनीच्या भाजी बाजारात राहायचे नाही, असा निर्धार करून सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे फलक काढून साहित्य जुन्या बाजाराच्या ठिकाणी हलविले. बीटीबीचा निषेध करण्यासाठी मुख्य मार्गावरून रॅली काढली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोठा बाजारात रॅलीचा समारोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)स्मरणपत्र झिडकारलेबीटीबी असोसिएशनचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांना पालिकेने १२ व १४ सप्टेंबर रोजी स्मरणपत्र दिले होते. या नोटीसांना बारापात्रे जुमानले नाही. या भाजी बाजारात सार्वजनिक सुविधा असणे बंधनकारक असताना कोणत्याही सार्वजनिक सुविधा नाहीत. बीटीबीमध्ये व्यवसाय सुरू करण्यापुर्वी व्यावसायिकांनी पालिकेला लेखी लिहून दिलेले नाही. व्यावसायिकांनी पालिकेचा परवाना घेतलेला नाही. त्यामुळे करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे करारनामा रद्द करण्यात येईल, सदर जागेचा वापर बंद करण्याबाबत पालिकेला अहवाल द्यावा, असेही पालिकेने बारापात्रे यांना नोटीसादाखल सांगितले होते. परंतु, एकाही नोटीसाला बारापात्रे यांनी उत्तरे दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना साकडेबीटीबीच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या भाजी बाजारात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच भाजी व्यापाऱ्यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तक्र ारीनुसार, बंडू बारापात्रे यांनी व्यापाऱ्यांना प्रति दुकान ५ लाख रूपयांची मागणी केली. प्रतिदिन १०० रूपये वसूली सुरू केली. यात आमची दिशाभूल करून भाजी बाजार स्थलांतरीत केला. यापूर्वीचा महात्मा फुले भाजी बाजारची नोंदणी न करता स्वत:च्या कुटूंबियांचा व मित्र परिवाराच्या नावे नवीन नोंदणी करून पालिकेसोबत करारनामा केला. त्यामुळे आम्हाला जुन्याच जागेवर व्यवसाय करायचे म्हटले होते. व्यापाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले होते.