शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

वरठी येथील इंग्रजकालीन तलावाच्या सौंदर्यीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

वरठी : रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील इंग्रजकालीन सात वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाच्या आर्षणाचे केंद्र असलेला ...

वरठी : रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील इंग्रजकालीन सात वर्षांपासून सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावाच्या आर्षणाचे केंद्र असलेला हा तलाव दुर्लक्षित असून सनफ्लॅग कंपनीच्या सीएसआर निधीतून होणारे सौंदर्यीकरणचे कामही कासवगतीने सुरू आहे. सात वर्षांतही काम पूर्ण न करण्याचे पराक्रम सनफ्लॅग व्यवस्थापनाने केले आहे. दुसरीकडे, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत असल्याने नागरिकांत रोष दिसत आहे.

वरठी येथे असलेल्या या तलावाचा उपयोग स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे इंजिनला पाणी पुरविण्यासाठी होत होता. रेल्वेस्थानकापासून तलावापर्यंत जुने रूळ होते. कालांतराने वाफेचे इंजिन बंद झाल्याने हा तलाव निरुपयोगी ठरला. मात्र गावाच्या मध्यभागी असल्याने या तलावाचे सौंदर्य कमी झाले नाही. उन्हाचा पारा कितीही चढला तरी तलावात पाणी कायम राहते. यामुळे गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्यासारखे होईल; पण लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे काम रखडले आहे.

वरठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांच्या संकल्पनेतून माजी सरपंच संजय मिरासे यांच्या काळात तलाव सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले होते. २०१४ साली रेल्वेने सदर तलावाचे सौंदर्यीकरणाच्या कामाला मंजुरी दिली होती. यात तलावाच्या चारीही बाजूंना काठांची निर्मिती करून बैठकीची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. तसचे तलावातील गाळ काढून पायऱ्या व परिसरातील चारीही दिशांना विद्युत्दीप लावायचे होते. मात्र आता सौंदर्यीकरणचे काम सात वर्षांपासून अर्धवट आहे. काम पूर्णत्वास नेण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. तलावाच्या काठांचे काम पूर्ण झाले असून, काही भागांत विद्युत व्यवस्था उभारण्यात आली आहे. पाण्याचा ओव्हरफ्लो व्यवस्थित होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत खांब उभारले असून त्यावर दिवे लावण्यात आले. पण अनेक दिवसांपासून ते शोभेची वस्तू ठरत आहेत.

बॉक्स.

सार्वजनिक उपयोगाचे एकमेव ठिकाण

पूर्वीच्या काळात सार्वजनिक उपयोगाचा एकमेव स्रोत म्हणजे हा तलाव होय. धार्मिक विधी व सार्वजनिक उत्सवादरम्यान मोठी गर्दी व्हायची. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने तलाव निरुपयोगी झाला. नियमित साफसफाई होत नसल्याने गावातील सार्वजनिक व घरगुती विसर्जन गावाबाहेर नदीत करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. दोन वर्षांपूर्वी तलावाच्या काठांवर वृक्षारोपण करण्यात आले होते. फोटो काढण्यापुरती झाडे लावून प्रशासन मोकळे झाले. झाडे जगवण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. वृक्षरोपण करताना कठडे व नियमित पाणीपुरवठा न झाल्याने सगळी झाडे वाळली आहेत.

कचराकुंडीचे स्वरूप

देखभाल-दुरुस्तीअभावी तलावाला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाच्या मध्यभागी आकर्षणाचे केंद्र असलेल्या तलावाला कचऱ्याचे माहेरघर बनविण्यात आले. तलावाच्या काठावर सर्वत्र घाण पसरलेली आहे. तलावाच्या काठाचा वापर शौचालय म्हणून होताना दिसते. तलावाचे पाणी कचऱ्याने भरून गेले आहे.

सनफ्लॅग चे वेळकाढू धोरण

गावात असलेला सनफ्लॅग कारखाना गावकऱ्यांसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. स्थानिक युवकांपेक्षा परप्रांतीय लोकांना रोजगार देणाऱ्या सनफ्लॅग व्यवस्थापनाने स्थानिक विकास कामात नेहमी उपेक्षा केली आहे. राजकीय दबावात सनफ्लॅग कंपनीचा सीएसआरचा निधी इतरत्र वाळवून तात्काळ कामे केली जातात. पण सात दिवसाच्या तलावाच्या कामाला सात वर्ष लोटूनही पूर्ण झाले नाही. त्यांच्या ऐवजी स्थानिक प्रशासनाने काम करावे अशी एकमुखी मागणी होत आहे.

180921\img_20210918_153018.jpg~180921\img_20210918_153013.jpg

तलावाच्या पाळीवर वाढलेले झुडूप~तलावात असलेली घाण