शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

बाबा कोरोनाने गेले, मेरे पास सिर्फ माँ है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच ...

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा

भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच अन्य एका नातेवाइकाचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच इतरही जबाबदारी पार पाडताना आता आईची कसरत होणार आहे. त्यामुळे घरातील कुटुंबकर्ता पुरुषच गेल्याने आता त्या कुटुंबाला शासनासोबतच समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

बॉक्स

कोरोनाकाळातही महिला बालविकास विभागाचे कार्य उल्लेखनीय

कोरोणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात घराबाहेर पडतानाही अंगावर काटा उभा राहत होता. मात्र अशाही परिस्थितीत कोरोनाने हिरावलेल्या आई-वडिलांची शोधमोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. महिला व बाल विकास कार्यालयाचे कामकाज एप्रिल महिन्यातही सुरूच होते. त्यामुळे कोरोना काळातील महिला व बालविकास विभागातर्फे राबवलेल्या सर्वेक्षण मोहिमेतून जिल्ह्यात आतापर्यंत किती पालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले याचा शोध घेण्यात आला आहे. आजही याचे काम सुरूच आहे. त्यामुळे अशा बालकांची शोध मोहीम घेऊन त्यांना शासनाची मदत मिळवून दिली जाणार आहे.

बॉक्स

घरातील कर्ता पुरुषच गेल्याने संकट

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेली जिल्ह्यात ४५२ बालके आहेत. घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आता या कुटुंबांना उदरनिर्वाह करताना मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. बाबांचे अकाली निधन झाल्याने आता मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाचा प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न काही महिलांना सतावत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी आता सरकार घेत असून शक्य तितकी मदत देण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

बॉक्स

पाच बालकांचे आईवडिलांचे छत्र हरवले

कोरोनामुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने पाच बालके ही निराधार झाली आहेत. आईवडील दोघांचा किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्या संदर्भात सर्वेक्षण जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच बालकांनी आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. तर ५० पालकांनी आपल्या आईला गमावले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४५२ बालकांनी आपल्या वडिलांना गमावले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असेल, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे.