शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

बाबा कोरोनाने गेले, मेरे पास सिर्फ माँ है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:26 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच ...

कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा

भंडारा तालुक्यातील एका गावातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. वृद्ध आई, वडील तसेच अन्य एका नातेवाइकाचा समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच इतरही जबाबदारी पार पाडताना आता आईची कसरत होणार आहे. त्यामुळे घरातील कुटुंबकर्ता पुरुषच गेल्याने आता त्या कुटुंबाला शासनासोबतच समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.

बॉक्स

कोरोनाकाळातही महिला बालविकास विभागाचे कार्य उल्लेखनीय

कोरोणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक होती. यामध्ये भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात घराबाहेर पडतानाही अंगावर काटा उभा राहत होता. मात्र अशाही परिस्थितीत कोरोनाने हिरावलेल्या आई-वडिलांची शोधमोहीम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. महिला व बाल विकास कार्यालयाचे कामकाज एप्रिल महिन्यातही सुरूच होते. त्यामुळे कोरोना काळातील महिला व बालविकास विभागातर्फे राबवलेल्या सर्वेक्षण मोहिमेतून जिल्ह्यात आतापर्यंत किती पालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले याचा शोध घेण्यात आला आहे. आजही याचे काम सुरूच आहे. त्यामुळे अशा बालकांची शोध मोहीम घेऊन त्यांना शासनाची मदत मिळवून दिली जाणार आहे.

बॉक्स

घरातील कर्ता पुरुषच गेल्याने संकट

कोरोनामुळे वडिलांचे छत्र हरवलेली जिल्ह्यात ४५२ बालके आहेत. घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आता या कुटुंबांना उदरनिर्वाह करताना मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. बाबांचे अकाली निधन झाल्याने आता मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाचा प्रपंच चालवायचा कसा असा प्रश्न काही महिलांना सतावत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी आता सरकार घेत असून शक्य तितकी मदत देण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

बॉक्स

पाच बालकांचे आईवडिलांचे छत्र हरवले

कोरोनामुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने पाच बालके ही निराधार झाली आहेत. आईवडील दोघांचा किंवा त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास त्या संदर्भात सर्वेक्षण जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच बालकांनी आई आणि वडील दोघांनाही गमावले आहे. तर ५० पालकांनी आपल्या आईला गमावले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४५२ बालकांनी आपल्या वडिलांना गमावले आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला असेल, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे.