शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

जागरुक ग्राहक काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:57 IST

संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व उपस्थित अधिकारी.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सामाजिक न्याय भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.व. भास्करे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.ग्राहक हा राजा आहे, त्यास संरक्षण मिळाले पाहिजे या उदात्त कल्पनेतून २४ डिसेंबर १०८६ रोजी ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. फसवणूक झाली तर त्याला न्याय मिळावा, तसेच त्याचा मोबदला मिळावा यासाठी बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची सुरुवात केली, असेही बोडखे म्हणाले. आॅनलाईन खरेदीवर अंकुश लावला पाहिजे. कायद्याच्या कवचाचा ग्राहकांनी योग्य वापर केला पाहिजे. तसेच समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आपली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असेही ते म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्यातील सुरक्षेचा अधिकार, वस्तू निवडीचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार या बाबीवर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले.कोणाचीही फसगत होत असेल तर जनतेनी त्यास सहकार्य केले पाहिजे. तरच खेरदीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल व प्रत्येक ग्राहकास न्याय मिळेल. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवली पाहिजे. पदाधिकाºयांनी ग्राहक चळवळ जोमाने वाढवावी जेणेकरुन सर्वांना न्याय मिळेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी सांगितले. अन्न भेसळी बाबत दुकानदारावर पूर्वी खटला दाखल होत होता. परंतु २०११ च्या मानदे कायद्यानुसार भेसळीचे किंवा फसवणुकीचे प्रमाण पाहून कारवाई करण्यात येते. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी सांगितले. वैध मापन शास्त्र कायदा २००९ ला अस्तित्वात आला असून त्यामध्ये दुकानदाराचे नाव, वजन, एमआरपी, पॅकींग केव्हा व कोठे झाले याबाबत माहिती घेतली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी केले तर संचलन व उपस्थिताचे आभार पल्लवी मोहाडीकर यांनी मानले.