शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

जागरुक ग्राहक काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:57 IST

संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व उपस्थित अधिकारी.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सामाजिक न्याय भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.व. भास्करे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.ग्राहक हा राजा आहे, त्यास संरक्षण मिळाले पाहिजे या उदात्त कल्पनेतून २४ डिसेंबर १०८६ रोजी ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. फसवणूक झाली तर त्याला न्याय मिळावा, तसेच त्याचा मोबदला मिळावा यासाठी बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची सुरुवात केली, असेही बोडखे म्हणाले. आॅनलाईन खरेदीवर अंकुश लावला पाहिजे. कायद्याच्या कवचाचा ग्राहकांनी योग्य वापर केला पाहिजे. तसेच समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आपली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असेही ते म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्यातील सुरक्षेचा अधिकार, वस्तू निवडीचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार या बाबीवर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले.कोणाचीही फसगत होत असेल तर जनतेनी त्यास सहकार्य केले पाहिजे. तरच खेरदीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल व प्रत्येक ग्राहकास न्याय मिळेल. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवली पाहिजे. पदाधिकाºयांनी ग्राहक चळवळ जोमाने वाढवावी जेणेकरुन सर्वांना न्याय मिळेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी सांगितले. अन्न भेसळी बाबत दुकानदारावर पूर्वी खटला दाखल होत होता. परंतु २०११ च्या मानदे कायद्यानुसार भेसळीचे किंवा फसवणुकीचे प्रमाण पाहून कारवाई करण्यात येते. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी सांगितले. वैध मापन शास्त्र कायदा २००९ ला अस्तित्वात आला असून त्यामध्ये दुकानदाराचे नाव, वजन, एमआरपी, पॅकींग केव्हा व कोठे झाले याबाबत माहिती घेतली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी केले तर संचलन व उपस्थिताचे आभार पल्लवी मोहाडीकर यांनी मानले.