शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जागरुक ग्राहक काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 21:57 IST

संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.

ठळक मुद्देमार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले व उपस्थित अधिकारी.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत सामाजिक न्याय भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले होते तर प्रमुख पाहूणे म्हणून, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक रा.व. भास्करे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.ग्राहक हा राजा आहे, त्यास संरक्षण मिळाले पाहिजे या उदात्त कल्पनेतून २४ डिसेंबर १०८६ रोजी ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. फसवणूक झाली तर त्याला न्याय मिळावा, तसेच त्याचा मोबदला मिळावा यासाठी बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची सुरुवात केली, असेही बोडखे म्हणाले. आॅनलाईन खरेदीवर अंकुश लावला पाहिजे. कायद्याच्या कवचाचा ग्राहकांनी योग्य वापर केला पाहिजे. तसेच समाजाला जागृत करण्याची जबाबदारी आपली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असेही ते म्हणाले. ग्राहक संरक्षण कायद्यातील सुरक्षेचा अधिकार, वस्तू निवडीचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार, आरोग्याचा अधिकार या बाबीवर विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले.कोणाचीही फसगत होत असेल तर जनतेनी त्यास सहकार्य केले पाहिजे. तरच खेरदीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल व प्रत्येक ग्राहकास न्याय मिळेल. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवली पाहिजे. पदाधिकाºयांनी ग्राहक चळवळ जोमाने वाढवावी जेणेकरुन सर्वांना न्याय मिळेल, असे अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी सांगितले. अन्न भेसळी बाबत दुकानदारावर पूर्वी खटला दाखल होत होता. परंतु २०११ च्या मानदे कायद्यानुसार भेसळीचे किंवा फसवणुकीचे प्रमाण पाहून कारवाई करण्यात येते. त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांनी सांगितले. वैध मापन शास्त्र कायदा २००९ ला अस्तित्वात आला असून त्यामध्ये दुकानदाराचे नाव, वजन, एमआरपी, पॅकींग केव्हा व कोठे झाले याबाबत माहिती घेतली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी केले तर संचलन व उपस्थिताचे आभार पल्लवी मोहाडीकर यांनी मानले.