शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली.

ठळक मुद्देहाती पैसा नसल्याने चिंतेत : अर्जुनी-मोरगाव तालुका वगळला

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागील वर्षाच्या खरीप हंगामातील धानाच्या बोनसची अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील समस्त शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. जिह्यातील इतर तालुक्यांत बोनसचे वाटप करण्यात आल्याची माहिती असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्यालाच बोनस वाटपाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशात लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. बोनस मिळणार यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बोनसच्या मिळणाऱ्या राशीने आजच्या खरीप हंगामात पैशांची अडचण भासणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु आजघडीला शेतकºयांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाला नाही हे वास्तव चित्र आहे. बोनस कधी मिळणार असा टाहो शेतकरी वर्गातून फोडला जात आहे.विशेष म्हणजे, शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आलेल्या धान व शेतकऱ्यांची माहिती दरदिवशी जिल्हा मार्केटींग कार्यालयात जाते. असे असताना बोनस वाटप करताना तालुका निहाय निकष का? ठेवण्यात आला असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहे. केंद्रावर दर दिवशी जशी खरेदी होते त्याचप्रमाणे बोनसचे वाटप जर झाले असते तर संपूर्ण तालुका बोनस पासून वंचीत राहिला नसता. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी यावर मुग गिळून का आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका विकासाचा निधी मिळण्यात मागे राहत आली. तरिही बोनस वाटपाच्या प्रक्रियेत अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर अन्याय होत असताना जबाबदार लोकप्रतिनिधी गेले कुठे असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी