शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली.

ठळक मुद्देहाती पैसा नसल्याने चिंतेत : अर्जुनी-मोरगाव तालुका वगळला

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागील वर्षाच्या खरीप हंगामातील धानाच्या बोनसची अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील समस्त शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. जिह्यातील इतर तालुक्यांत बोनसचे वाटप करण्यात आल्याची माहिती असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्यालाच बोनस वाटपाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशात लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. बोनस मिळणार यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बोनसच्या मिळणाऱ्या राशीने आजच्या खरीप हंगामात पैशांची अडचण भासणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु आजघडीला शेतकºयांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाला नाही हे वास्तव चित्र आहे. बोनस कधी मिळणार असा टाहो शेतकरी वर्गातून फोडला जात आहे.विशेष म्हणजे, शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आलेल्या धान व शेतकऱ्यांची माहिती दरदिवशी जिल्हा मार्केटींग कार्यालयात जाते. असे असताना बोनस वाटप करताना तालुका निहाय निकष का? ठेवण्यात आला असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहे. केंद्रावर दर दिवशी जशी खरेदी होते त्याचप्रमाणे बोनसचे वाटप जर झाले असते तर संपूर्ण तालुका बोनस पासून वंचीत राहिला नसता. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी यावर मुग गिळून का आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका विकासाचा निधी मिळण्यात मागे राहत आली. तरिही बोनस वाटपाच्या प्रक्रियेत अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर अन्याय होत असताना जबाबदार लोकप्रतिनिधी गेले कुठे असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी