शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हल्लेखोर सीटी- 1 वाघाचा मुक्काम वडसा जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:42 IST

चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन जिल्ह्यात १२ जणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर सीटी- १ वाघाने आपला मुक्काम लाखांदूर तालुक्याच्या  इंदोरा जंगलातून जिल्ह्याच्या सीमेवरील वडसा जंगलात हलविला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी गत आठ दिवसांपासून वनविभाग प्रयत्न करीत असला तरी चलाख वाघ त्यांना सतत हुलकावणी देत आहे. यामुळे लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये वाघाची दहशत कायम असून वनविभाग वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो. आपर्यंत बाराजणांचा बळी घेतल्याने तो जंगलात राहण्यायोग्य नसल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग आले आहे. त्यामुळेच त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग जीवाचे रान करीत आहे. मात्र, तो हुलकावणी देत तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात भटकत आहे. तो कधीही जिल्ह्यातील जंगलात शिरण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाखांदूर तालुक्यात मचाणीवर खडा पहारा

- इंदोरा जंगलात २० सप्टेंबर रोजी अरुण मंडल हा व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आदेश दिले. शार्पशूटरसह वनविभागाच्या पथकाने जंगल पालथे घातले. इंदोरा जंगलात पाच ठिकाणी मचाण उभारून खडा पहारा देण्यात आला. तो या परिसरात आला की त्याला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.

सीटी- १ वाघ सध्या वडसा भागात आहे. मात्र, भंडारा वनविभागाची गस्त सुरु आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी कर्मचारी जंगलात तैनात आहे. वाघ टप्प्यात आला की त्याला जेरबंद करण्यात येईल. - राहूल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

सीटी-१ वाघ आणखी कुणाचा बळी घेण्यापुर्वी त्याला बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे.- शाहिद खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव