शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हल्लेखोर सीटी- 1 वाघाचा मुक्काम वडसा जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:42 IST

चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन जिल्ह्यात १२ जणांचा बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर सीटी- १ वाघाने आपला मुक्काम लाखांदूर तालुक्याच्या  इंदोरा जंगलातून जिल्ह्याच्या सीमेवरील वडसा जंगलात हलविला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी गत आठ दिवसांपासून वनविभाग प्रयत्न करीत असला तरी चलाख वाघ त्यांना सतत हुलकावणी देत आहे. यामुळे लाखांदूर तालुक्यातील गावांमध्ये वाघाची दहशत कायम असून वनविभाग वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केली होती. त्यानंतर विविध भागात हल्ले करून माणसांना ठार मारले. हल्लेखोर वाघाने शिकार करण्याची सवय बदलली असून तो रात्रीच्या वेळीच शिकार करतो. आपर्यंत बाराजणांचा बळी घेतल्याने तो जंगलात राहण्यायोग्य नसल्याच्या निष्कर्षाप्रत वनविभाग आले आहे. त्यामुळेच त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग जीवाचे रान करीत आहे. मात्र, तो हुलकावणी देत तीन जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात भटकत आहे. तो कधीही जिल्ह्यातील जंगलात शिरण्याची शक्यता असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाखांदूर तालुक्यात मचाणीवर खडा पहारा

- इंदोरा जंगलात २० सप्टेंबर रोजी अरुण मंडल हा व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आदेश दिले. शार्पशूटरसह वनविभागाच्या पथकाने जंगल पालथे घातले. इंदोरा जंगलात पाच ठिकाणी मचाण उभारून खडा पहारा देण्यात आला. तो या परिसरात आला की त्याला कोणत्याही परिस्थितीत बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.

सीटी- १ वाघ सध्या वडसा भागात आहे. मात्र, भंडारा वनविभागाची गस्त सुरु आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी कर्मचारी जंगलात तैनात आहे. वाघ टप्प्यात आला की त्याला जेरबंद करण्यात येईल. - राहूल गवई, उपवनसंरक्षक, भंडारा

सीटी-१ वाघ आणखी कुणाचा बळी घेण्यापुर्वी त्याला बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. वनविभागाचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे.- शाहिद खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.

 

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव