शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 5:00 AM

भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्यांकडे रासायनिक खतच उपलब्ध नाही. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन रासायनिक खतांची मागणी करतात.

ठळक मुद्देदरवाढीचे वेध : किरकोळ विक्रेत्यांना खत देण्यास नकार, रॅक पाॅईंटवर उतरलेले खत गेले कुठे?

मुकेश देशमुख लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसाने सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. पाण्याची सहज उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. त्यामुळे जिल्ह्यात रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. परंतु, सध्या जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. रासायनिक खतांचा साठा जिल्ह्याच्या रॅक पाॅइंटवर उतरवला खरा; परंतु, अद्यापही किरकोळ विक्रेत्यांना खत देण्यात आले नाही. रासायनिक खतांवर अधिभार लागला असल्याची बतावणी करीत साठेबाजी केली जात आहे. खत कंपन्यांना दरवाढीचे वेध लागल्याचे बोलले जात आहे.भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यासोबतच भाजीपाला आणि गव्हाचे पिकही घेतले जाते. यंदा प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. या पिकांना आता रासायनिक खतांची गरज आहे. परंतु, किरकोळ विक्रेत्यांकडे रासायनिक खतच उपलब्ध नाही. अनेक शेतकरी किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन रासायनिक खतांची मागणी करतात. परंतु, त्यांच्याकडेच साठा नसल्याने ते हतबल झाले आहे.गत आठवड्यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी तीन कंपन्यांच्या रासायनिक खताची रॅक आल्याची माहिती आहे. हा सर्व खतसाठा कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला दिला गेला नाही. त्यामुळे कंपनी व घाऊक विक्रेते साठेबाजी करून दरवाढीची प्रतीक्षा तर करीत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. योग्य वेळी शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळाले नाही, तर त्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही शेतकरी चढ्या भावात खत खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृषी आयुक्तालयाकडून गंभीर दखल पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या वतीने जिल्हानिहाय रासायनिक खत    उपलब्धतता आढावा घेण्यात आला. त्यात काही जिल्ह्यांत खत उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी २४ फेब्रुवारी रोजी खत उत्पादक कंपन्यांना ई-मेल पाठविला. त्यात त्यांनी खत पुरवठादार कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खतसाठा घाऊक विक्रेत्यांच्या गोदामात तसेच खासगी कंपन्यांत साठवणूक केला जात असल्याचे तसेच बहुतांश किरकोळ विक्रेत्यांना खते उपलब्ध करून दिली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. ही बाब गंभीर स्वरूपाची असून शेतकऱ्यांपर्यंत खते न पोहोचल्यास केंद्रीय खत अनुदान थांबविण्याचे निर्देशही दिले. 

कृषी अधिकाऱ्यांना दिले निर्देश साठेबाजीला आळा बसावा व किरकोळ विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना मुबलक साठा उपलब्ध व्हावा यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे निर्देश एका पत्रातून दिले आहेत. आता याची कितपत अंमलबाजवणी होते याकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील किरकोळ रासायनिक खत विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांना सध्या रासायनिक खतांची निकड आहे. परंतु खत मिळत नसल्याने अनेक शेतकरी भटकंती करीत आहेत. दुसरीकडे किरकोळ विक्रेतेही त्रस्त झाले आहेत.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र