शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जाळपोळ अन् दगडफेक

By admin | Updated: February 22, 2015 00:21 IST

शिल्पा जांभुळकर या तरुणीच्या खूनप्रकरणी संतप्त जमावाने पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शनिवारला सकाळपासूनच वलनी चौरस्ता रोखून धरला.

आसगाव/पवनी : शिल्पा जांभुळकर या तरुणीच्या खूनप्रकरणी संतप्त जमावाने पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शनिवारला सकाळपासूनच वलनी चौरस्ता रोखून धरला. काहींनी रस्त्यावर टायर पेटवून निषेध नोंदविला तर काहींनी दगडफेक करुन पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटनास्थळावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. सकाळी ११ पासून सायंकाळी ४ पर्यंत संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी रस्तारोको केल्याने लाखांदूर मार्गावरील वाहतूक पुर्णत: खोळंबली होती. तणाव कायम असतानाच पोलीस अधीक्षकांनी बीट जमादाराला निलंबित केल्याचे घोषित केल्यानंतर तणाव निवळला.आज शनिवारला सकाळपासून वलनी, आसगाव आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये या प्रकरणाविषयी असंतोष खदखदत होता. ग्रामस्थांनी स्वत:हून खैरी - दिवाण चौरस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी राज्य राखीव दलासह दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले होते. यावेळी पोलिसांनी मृतकाच्या कुटूंबियांची मनधरनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव जुमानत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणे कठिण झाली होती. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे परिस्थिती पुन्हा चिघळली. आणि नागरिकांनीही पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यात पोलिस वाहनाच्या काचा फुटल्या. या झटापटीत रूपाली नेवारे आणि योगिता वाढई या पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यात आंदोलनकर्तेही जखमी झाले.दरम्यान, रास्ता रोको सुरू असलेल्या वलनी चौरस्त्यावर भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारस्कर, पवनीचे तहसीलदार नरेंद्र राचेलवार हे दाखल झाले. त्यांनी मृतकाच्या कुटूंबियांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव जुमानत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. (वार्ताहर / शहर प्रतिनिधी)ठाणेदाराची बदली, हवालदार निलंबितयाप्रकरणात ठाणेदाराची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांच्यावर निलंबनाची मागणी केली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी ठाणेदार राजेंद्र नागरे यांची तडकाफडकी भंडारा मुख्यालयात बदली केली. तर बीट जमादार फुलचंद सिंधीमेश्राम यांना निलंबित करण्यात आले. सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषीवर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षक कणसे यांनी नातेवाईकांना दिली. पोलिसांनी केले होते तक्रारीकडे दुर्लक्षवलनी येथील शिल्पा जांभुळकर या तरुणीचा खून वैमनस्यातून की एकतर्फी प्रेमप्रकरणातून हे गृढ कायम असले तरी आरोपी देवेंद्र गभणे याने तिला यापूर्वीच छळले होते. त्यानंतर त्याची पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. परंतु पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिल्पाला जीव गमवावा लागला. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण जिल्हाभरात उमटले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत.