शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:01 IST

सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते. मृग नाही तर आर्द्र नक्षत्र नक्की पाऊस आणतो अशी शेतकऱ्यांची मान्यता असून त्या अंदाजाने शेती कार्य केले जातात.

ठळक मुद्देतलाव, बोड्यांमध्ये साचले पाणी : रोवणीच्या कामाला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात सुद्धा पावसाच्या आगमनाने झाली नव्हती. मात्र आषाढी पोर्णिमा संपताच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पुढे एक दोन दिवस असाच पाऊस झाल्यास तालुक्यात सर्वत्र रोवणीला सुरुवात होऊ शकते.सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते. मृग नाही तर आर्द्र नक्षत्र नक्की पाऊस आणतो अशी शेतकऱ्यांची मान्यता असून त्या अंदाजाने शेती कार्य केले जातात. परंतु यंदा आर्द्र नक्षत्र सुद्धा जवळपास कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान पावसाअभावी शेतातील पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर होते. सोमवारी झालेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

उंदिराने केली परतफेडयंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे वाहन म्हैस होते. म्हशीला पाण्याची गरज असते. परंतु तरी सुद्धा या वाहनाने पावसाला आवाहन केले नाही असे वाटले. त्यानंतर पावसाचे वाहन घोडा बनला. नंतर लगेच आर्द्र नक्षत्राला सुरुवात झाली. घोडा हा तेज धावण्यासाठी ओळखला जातो. त्यानुसार धावत्या वेगाने पाऊस पडण्याची शक्यता होती. परंतु घोड्याचा पावसाशी व शेतीशी तेवढा संबंध येत नाही. म्हणून त्यानेही पावसाचे आवाहन केले नसावे. आषाढी पोर्णिमेच्या दिवशी पावसाचे वाहन उंदिर बनले. उंदिराने यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतीतून भरपूर अन्न ग्रहण केले. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. कदाचित त्याचीच परतफेड करण्यासाठी दमदार पाऊस बसरत आहे.

टॅग्स :Rainपाऊस