शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मार्चएण्डची येता वारी ताळेबंदाची घाई भारी

By admin | Updated: March 28, 2015 00:33 IST

आर्थिक वर्षअखेर असलेल्या मार्च महिन्याचा शेवट हा टेन्शन वाढविणारा असल्याने अनेकांची ताळेबंद पूर्ण करण्यासाठी आणि विवरणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.

भंडारा : आर्थिक वर्षअखेर असलेल्या मार्च महिन्याचा शेवट हा टेन्शन वाढविणारा असल्याने अनेकांची ताळेबंद पूर्ण करण्यासाठी आणि विवरणपत्रे सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. वैयक्तिक करदात्यांची ही धावपळ सुरू असताना तिकडे ताळेबंद पूर्णत्वासाठी बँकांची कामेही थंडावली आहेत. ३१ मार्च हा आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस असतो. या दिवशी वर्षभरातील सर्व हिशेब पूर्ण करून त्यावर आधारित ताळेबंद तयार करायचे असते. जमा-खर्चाचा हिशेब करून संस्थेची वाटचाल स्पष्ट करणारी नफा तोटा पत्रके याच कालावधीत बनविली जातात. त्यासाठी आवश्यक लेखापरीक्षण आणि अकाऊंट तपासणीचे कामही आता अंतिम टप्प्यात असल्याने व्यावसायीकांची धावपळ वाढली आहे. (प्रतिनिधी)अखर्चित निधीची काळजीजिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महसूल, बँका, प्राप्तीकर, विक्रीकर आदी सरकारी खात्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च महिना मार्च करायला लावणारा ठरतो आहे. अनेक खात्यांना ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याची कसरत करावी लागत आहे. बहुतांश सरकारी खात्यांत उद्दिष्टपूवर्तींची धांदल उडाली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रक्त्दाब वाढण्यास सुरूवात झाली आहे.उद्योजकांची धावपळउद्योजकांचीदेखील मार्च महिन्याच्या आॅर्डर ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची घाई आहे. मुदतीत मालाचा पुरवठा न झाल्यास अनेकांची नाराजी पत्करावी लागण्याची त्यांना भीती आहे. या महिन्यातच जीवघेणा उन्हाळा सुरू होईल. साहजिकच उत्पादन क्षमतेवरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न आहेत.व्यावसायिकांचा ताळेबंदव्यावसायीकांसाठी मार्च महिना हा 'मार्च' करायला लावणारा आहे. आर्थि वर्षाची गणिते कशी जुळतील याचे काही जणांना टेन्शन आहे तर काहींना कर वाचविण्याची चिंता आहे. गुंतवणुकीवर करातून सवलत देणाऱ्या एजन्सी सरकारी असोत वा खासगी, सर्वांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्टपूर्ती झालीच पाहिजे, अशी सक्ती त्यांच्यावर करण्यात आली आहे. टीडीएस आणि विवरणपत्र३१ मार्चपूर्वी केलेल्या गुंतवणुकीची विवरणपत्रे प्राप्तीकर खात्या सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. विवरणपत्रे सादर केल्यानंतर कराच्या रूपाने कपात केलेला पैसा त्यांना परताव्याच्या माध्यमातून परत मिळणार आहे. मार्च महिन्यात आवश्यक असणारी गुंतवणूक न केल्यास कपात केलेली रक्कम त्यांना परत मिळणार नाही. टीडीएसच्या रूपात कपात झालेले पैसे परत मिळविण्यासाठी विवरणपत्र दाखल करावे लागणार आहे. मागील आर्थिक वर्षात विवरणपत्र दाखल न केलेल्यांना ३१ मार्चपूर्वी ते दाखल करण्याची धावपळ करावी लागत आहे. याशिवाय लेखापरीक्षण आणि हिशेब तपासणी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.बँका आणि कर सल्लागार कार्यालयात जादा कामबँकांना त्यांचे हिशेब आर्थिक वर्ष अखेरीस पूर्ण करावयाचे असल्याने बँकेच्या नियमित वेळेव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत थांबून कर्मचारी काम पूर्ण करीत आहेत. त्यामुळे बँका रात्री उशिरापर्यंत सुरू दिसत आहेत. या कामावर देखरेख ठेवायचे काम करणारे कर सल्लागार आणि सनदी लेखापाल यांच्या कार्यालयातील कर्मचारीही दिवसरात्र काम करून त्यांच्या ग्राहकांचे हिशेब पूर्ण करण्याच्या कामात गुंतले असल्याने कार्यालयात धावपळ सुरू आहे. विवरपत्रे दाखल होत असल्याने आयकर कार्यालयामध्येही गजबजाट आहे.