शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

लग्न पत्रिकासह करा तहसीलमध्ये अर्ज आणि घ्या लग्नाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करीत लग्नसमारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित वधू-वर यांनी तहसीलदारांकडे साध्या पद्धतीने अर्ज करून त्यासोबत लग्नपत्रिका जोडणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्दे५० जणांनाच राहता येणार लग्न साेहळ्यात उपस्थित

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लग्न समारंभासाठी परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. लग्न पत्रिकेसह सबंधित तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर लग्नाची परवानगी दिली जाते. परिणामी वधू-वरांसह कुटुंबांची परवड होत नसल्याचे चित्र आहे.कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करीत लग्नसमारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित वधू-वर यांनी तहसीलदारांकडे साध्या पद्धतीने अर्ज करून त्यासोबत लग्नपत्रिका जोडणे अनिवार्य आहे. लग्न सोहळ्याला परवानगी देण्याची पद्धत सुलभ असल्याने फारशी गैरसोय होत नसल्याचे चित्र आहे. लग्न समारंभातील गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, मंगल कार्यालयात सॅनिटायझर तसेच मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन मात्र कायम  आहे. 

लग्नासाठी नियमावलीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लग्नसोहळ्याला परवानगी देतानाच काही नियम  घालण्यात आले आहे लग्नसमारंभाला जास्तीत जास्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. मंगल कार्यालय किंवा लग्न समारंभ स्थळ सॅनिटायझर करणे गरजेचे आहे. ही व्यवस्था असणे अनिवार्य आहे. उपस्थित प्रत्येकाने मास्क यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.

कोरणा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात जरी लग्न करायचे असले तरी परवानगी घेणे बंधनकारक  आहे. यासाठी एक अर्ज आणि लग्नपत्रिका जोडली की लग्नाला परवानगी मिळते. त्यामुळे आम्हाला फारशी गैरसोय झाली नाही. - धनपाल गिरीपुंजे,                     वरपिता, खरबी (नाका)

परवानगीसाठी सुलभ प्रक्रीयालग्नसोहळ्यासाठी परवानगी घेताना वधू-वर पित्याची तसेच वऱ्हाडी मंडळींची दमछाक होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय स्तरावर परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   लग्नपत्रिकेत लग्नस्थळ उल्लेख असणे व परवानगी अर्ज जोडले की विहित कालावधीत सदर लग्न सोहळ्यासाठी परवानगी दिली जाते.

लग्नसमारंभासाठी परवानगी घेण्याची पद्धत फारच किचकट असेल, असे वाटले होते. परवानगी घेण्यासाठी जास्त धावपळ करावी लागली नाही. आवश्यक कागदपत्र व लग्नपत्रिका जोडून अर्ज सादर करणे महत्वाचे आहे. सदर बाबतीत शासकीय कर्मचारी यांचे वेळीच सहकार्य मिळाल्याचे समाधान आहे.  - माणिक उरकुडे, वधूपिता

 

टॅग्स :marriageलग्नCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या