शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

लग्न पत्रिकासह करा तहसीलमध्ये अर्ज आणि घ्या लग्नाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करीत लग्नसमारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित वधू-वर यांनी तहसीलदारांकडे साध्या पद्धतीने अर्ज करून त्यासोबत लग्नपत्रिका जोडणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्दे५० जणांनाच राहता येणार लग्न साेहळ्यात उपस्थित

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लग्न समारंभासाठी परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. लग्न पत्रिकेसह सबंधित तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर लग्नाची परवानगी दिली जाते. परिणामी वधू-वरांसह कुटुंबांची परवड होत नसल्याचे चित्र आहे.कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करीत लग्नसमारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित वधू-वर यांनी तहसीलदारांकडे साध्या पद्धतीने अर्ज करून त्यासोबत लग्नपत्रिका जोडणे अनिवार्य आहे. लग्न सोहळ्याला परवानगी देण्याची पद्धत सुलभ असल्याने फारशी गैरसोय होत नसल्याचे चित्र आहे. लग्न समारंभातील गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, मंगल कार्यालयात सॅनिटायझर तसेच मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन मात्र कायम  आहे. 

लग्नासाठी नियमावलीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लग्नसोहळ्याला परवानगी देतानाच काही नियम  घालण्यात आले आहे लग्नसमारंभाला जास्तीत जास्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. मंगल कार्यालय किंवा लग्न समारंभ स्थळ सॅनिटायझर करणे गरजेचे आहे. ही व्यवस्था असणे अनिवार्य आहे. उपस्थित प्रत्येकाने मास्क यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.

कोरणा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात जरी लग्न करायचे असले तरी परवानगी घेणे बंधनकारक  आहे. यासाठी एक अर्ज आणि लग्नपत्रिका जोडली की लग्नाला परवानगी मिळते. त्यामुळे आम्हाला फारशी गैरसोय झाली नाही. - धनपाल गिरीपुंजे,                     वरपिता, खरबी (नाका)

परवानगीसाठी सुलभ प्रक्रीयालग्नसोहळ्यासाठी परवानगी घेताना वधू-वर पित्याची तसेच वऱ्हाडी मंडळींची दमछाक होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय स्तरावर परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.   लग्नपत्रिकेत लग्नस्थळ उल्लेख असणे व परवानगी अर्ज जोडले की विहित कालावधीत सदर लग्न सोहळ्यासाठी परवानगी दिली जाते.

लग्नसमारंभासाठी परवानगी घेण्याची पद्धत फारच किचकट असेल, असे वाटले होते. परवानगी घेण्यासाठी जास्त धावपळ करावी लागली नाही. आवश्यक कागदपत्र व लग्नपत्रिका जोडून अर्ज सादर करणे महत्वाचे आहे. सदर बाबतीत शासकीय कर्मचारी यांचे वेळीच सहकार्य मिळाल्याचे समाधान आहे.  - माणिक उरकुडे, वधूपिता

 

टॅग्स :marriageलग्नCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या