शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मूळ पेंशन योजना लागू करा

By admin | Updated: October 14, 2015 00:46 IST

राज्य शासनाने १ आॅक्टोंबर २००५ रोजी निर्णय घेऊन १ नोव्हेंबर. २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करुन नविन परिभाषीत निवृत्ती पेंशन योजना अंमलात आणली.

प्राथमिक शिक्षक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : राज्य शासनाने १ आॅक्टोंबर २००५ रोजी निर्णय घेऊन १ नोव्हेंबर. २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करुन नविन परिभाषीत निवृत्ती पेंशन योजना अंमलात आणली. ही योजना शासकीय कर्मचाऱ्यांवर थोपवून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. परिणामी जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी पेंशन ही त्यांनी अखंड व प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेनंतर जगण्यासाठी मिळणारा हक्क आहे. त्यामुळे तत्कालीन सरकारने तात्काळ निर्णय घेऊन १९८२ ची मुळ पेंशन योजना शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातून हद्दपार केली. वेतनातून कपात केलेली १० टक्के व तेवढीच शासनाचे असे मिळून जमा रकमेच्या ४० टक्के रक्कम निवृत्तीनंतर मिळणार आहे. उर्वरीत ६० टक्के कधी मिळणार याची शाश्वती नाही. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबांना निवृत्तीवेतन मिळणार नाही. अनुकंपा योजनेखाली वारसाला नोकरी मिळणार नाही. भविष्य निर्वाह निधी काढण्याची तरतूद नाही. अशा अनेक जाचक अटी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटूंबांची कुंचबना होऊ नये म्हणून अंशदान पेंशन योजना त्वरित बंद करुन १९८२ ची मुळ पेंशन योजना सरसकट लागू करावी, अशी मागणी आहे. तसेच डीसीपीएस अंतर्गत कपात केलेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)अशैक्षणिक कामे देऊ नकाजिल्हयातील प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करणे व मतदान यादी संक्षिप्त पूर्णनिरीक्षण करण्यासाठी महसूल विभागाचे आदेश आहेत. आरटीई कायदयानुसार प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया वगळता इतर कोणत्याही प्रयोजनार्थ राज्यशासन, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी संस्थेद्वारे संचालित प्राथमिक व माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवा वापरण्यात येऊ नयेत असे नमुद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांकडे बीएलओ व अन्य कामे देण्यात येऊ नये, अन्यथा जिल्हास्तरीय शिक्षक आंदोलन करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.