शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

मूळ पेंशन योजना लागू करा

By admin | Updated: October 14, 2015 00:46 IST

राज्य शासनाने १ आॅक्टोंबर २००५ रोजी निर्णय घेऊन १ नोव्हेंबर. २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करुन नविन परिभाषीत निवृत्ती पेंशन योजना अंमलात आणली.

प्राथमिक शिक्षक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : राज्य शासनाने १ आॅक्टोंबर २००५ रोजी निर्णय घेऊन १ नोव्हेंबर. २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची १९८२ ची मूळ पेंशन योजना बंद करुन नविन परिभाषीत निवृत्ती पेंशन योजना अंमलात आणली. ही योजना शासकीय कर्मचाऱ्यांवर थोपवून १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. परिणामी जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी पेंशन ही त्यांनी अखंड व प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेनंतर जगण्यासाठी मिळणारा हक्क आहे. त्यामुळे तत्कालीन सरकारने तात्काळ निर्णय घेऊन १९८२ ची मुळ पेंशन योजना शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातून हद्दपार केली. वेतनातून कपात केलेली १० टक्के व तेवढीच शासनाचे असे मिळून जमा रकमेच्या ४० टक्के रक्कम निवृत्तीनंतर मिळणार आहे. उर्वरीत ६० टक्के कधी मिळणार याची शाश्वती नाही. सेवेत असतांना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबांना निवृत्तीवेतन मिळणार नाही. अनुकंपा योजनेखाली वारसाला नोकरी मिळणार नाही. भविष्य निर्वाह निधी काढण्याची तरतूद नाही. अशा अनेक जाचक अटी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटूंबांची कुंचबना होऊ नये म्हणून अंशदान पेंशन योजना त्वरित बंद करुन १९८२ ची मुळ पेंशन योजना सरसकट लागू करावी, अशी मागणी आहे. तसेच डीसीपीएस अंतर्गत कपात केलेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)अशैक्षणिक कामे देऊ नकाजिल्हयातील प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर अद्ययावत करणे व मतदान यादी संक्षिप्त पूर्णनिरीक्षण करण्यासाठी महसूल विभागाचे आदेश आहेत. आरटीई कायदयानुसार प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया वगळता इतर कोणत्याही प्रयोजनार्थ राज्यशासन, स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी संस्थेद्वारे संचालित प्राथमिक व माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या सेवा वापरण्यात येऊ नयेत असे नमुद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांकडे बीएलओ व अन्य कामे देण्यात येऊ नये, अन्यथा जिल्हास्तरीय शिक्षक आंदोलन करतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.