शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची सूचना : ४८ तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात माहिती संबंधित विमा कंपनीला सादर करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे.जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.शेतकºयांनी पीक नुकसान सूचना फॉर्म सोबत पीक विमा भरलेल्या पावतीची झेरॉक्स आणि शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रावर सदर अर्ज उपलब्ध आहे. दोन दिवसाच्या आत विमा कंपनीचा प्रतिनिधी किंवा सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी सहाय्य, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी येथेही हा अर्ज सादर करता येणार आहे.शेतकºयांच्या नुकसानीचे कृषी विभाग सर्वेक्षण करणार आहे. परंतु त्याआधी शेतकºयांनी स्वत: विमा कंपनीकडे सातबारा, नुकसानग्रस्त पिकाचे फोटो, आधारकार्ड, बँकेचा खातेक्रमांक यासह उपरोक्त दिलेल्या ई-मेलवर अथवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीलाल माहिती दिल्यास त्यांना पीक विमा मिळणे सोपे जाईल. यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सलग सुटीमुळे कृषी व महसूल विभागाचे सर्वेक्षण अद्यापही सुरु झाले नाही.त्यामुळे ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनीपर्यंत पोहचविण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच आता आपल्या शेतातील नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, कृषी विभागाच्या मदतीने सर्वेक्षण लवकरच सुरु होणारआहे.-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Farmerशेतकरी