शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची सूचना : ४८ तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात माहिती संबंधित विमा कंपनीला सादर करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे.जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दावा करण्यासाठी प्रपत्राद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.शेतकºयांनी पीक नुकसान सूचना फॉर्म सोबत पीक विमा भरलेल्या पावतीची झेरॉक्स आणि शेतीचा सातबारा जोडणे आवश्यक आहे. सेतू सुविधा केंद्रावर सदर अर्ज उपलब्ध आहे. दोन दिवसाच्या आत विमा कंपनीचा प्रतिनिधी किंवा सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, कृषी सहाय्य, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी येथेही हा अर्ज सादर करता येणार आहे.शेतकºयांच्या नुकसानीचे कृषी विभाग सर्वेक्षण करणार आहे. परंतु त्याआधी शेतकºयांनी स्वत: विमा कंपनीकडे सातबारा, नुकसानग्रस्त पिकाचे फोटो, आधारकार्ड, बँकेचा खातेक्रमांक यासह उपरोक्त दिलेल्या ई-मेलवर अथवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीलाल माहिती दिल्यास त्यांना पीक विमा मिळणे सोपे जाईल. यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्यात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सलग सुटीमुळे कृषी व महसूल विभागाचे सर्वेक्षण अद्यापही सुरु झाले नाही.त्यामुळे ४८ तासात नुकसानीची माहिती विमा कंपनीपर्यंत पोहचविण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनीच आता आपल्या शेतातील नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, कृषी विभागाच्या मदतीने सर्वेक्षण लवकरच सुरु होणारआहे.-मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Farmerशेतकरी