शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरीविरोधी कायदा कागदावरच !

By admin | Updated: December 10, 2015 00:51 IST

जिल्ह्यातील बाल मजुरींचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी योग्य स्वरूपात करण्यात आलेली नाही....

अधिकाऱ्यांची उदासीनता : सर्रास राबत आहेत बालके, बालमजुरीविरोधी समिती ठरली नावापुरतीभंडारा : जिल्ह्यातील बाल मजुरींचे प्रमाण कमी व्हावे, याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी योग्य स्वरूपात करण्यात आलेली नाही. बाल मजुरी समाप्तीसारखे प्रकल्प कागदोपत्रीच राबविण्यात आल्याने बाल मजुराची स्थिती अजूनही जैसे थे असल्याचे चित्र आहे.बालवयात मुलांना करावी लागणारी मजुरी आणि त्याचे हरविणारे बालपण यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने बालमजुरीच्या विरोधात कठोर कायदा केला आहे. मात्र, जिल्ह्यात या कायद्याची कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न होता केवळ कागदोपत्रीच हा कायदा राहिला आहे. कायद्याच्या अंबलबजावणीकरिता तसेच बालमजुरीला आळा बसावा, यासाठी राज्यात विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र सदर समित्यांचे काम केवळ बैठीकीपुरतेच मर्यादित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या बालमजुरी विरोधातील समितीमध्ये पोलीस विभाग, कामगार कल्याण, आरोग्य विभाग, नगर परिषद तसेच जिल्हा परिषदेमधील प्रतिनिधींचा समावेश आहे. बालमजूरी आणि वेठबिगारी विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयामध्ये या कायद्याचा प्रचार करणारी भिंतीपत्रके लागली सुरुवातीला आली. मात्र कालांतराने हा विषय मागे पडत गेला. आज बालमजुरी दिसत असतानाही प्रशासन गप्प का हे जिल्ह्यात दिसत असलेल्या चित्रावरून स्पष्ट होते. तज्ज्ञाच्या मते बालकांचा व्यावसायिक कामासाठी करण्यात येणाऱ्या वापरामुळे बालकाचे सर्वात मोठे नुकसान होत आहे. शिवाय विटभट्या, खदानी, मोटार दुरूस्ती, हॉटेल या ठिकाणी राबणाऱ्या बालमजुरांना प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगाचा धोका असतो. ज्या ठिकाणी ही बालके राबतात, तेथील मालकच बालकांना गुटखा, तंबाखू, सिंगारेट, दारू प्रथम आणायला सांगतात. नंतर मात्र त्या सवयी या बालमजुरांना जडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. या सर्व बाबीकडे जिल्ह्यात कार्यरत असलेली बालमजुरी विरोधातील समिती उघड्या डोळ्याने बघत आहे. असे असताना याबाबत अजूनही कोणतीच कारवाई करत नसल्याने जिल्ह्यातील बालमजुरांची स्थिती जैसे थे दिसून येत आहे. बालमजुरी विरोधी कायदा व बाल मजुरी समाप्ती प्रकल्प कागदावरच राहिला आहे. त्यामुळे आता बालमजुरिविरूध्द जनजागरण अभियान राबविण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)