शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

मृतदेह बघून संतापाचा स्फोट; अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 09:11 IST

पोलिस संरक्षणामुळे अनुचित घटना टळली.  

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आयुध निर्माणीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला तर पाच  गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी आठही मृतदेह आयुध निर्माणी व्यवस्थापनाने नातेवाइकांच्या ताब्यात देण्यासाठी आणले. यावेळी संतप्त जमावाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. मात्र, पोलिस संरक्षणामुळे अनुचित घटना टळली.  

शवविच्छेदनानंतर रुग्णालयातून मृतदेह महाव्यवस्थापकांच्या कार्यालयापुढील मैदानात शेडमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळपासूनच साहुली, सावरी, इंदिरानगर, ठाणा तसेच जवाहरनगर आयुध निर्माणी वसाहतीमधील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.  यावेळी जमावाने घोषणाबाजी केली.  मुख्य महाव्यवस्थापक अंत्यदर्शनासाठी पोहोचले. ते परत जात असताना जमावाने त्यांना घेराव करून धक्काबुक्की केली.  

पुनर्वसनाच्या मागणीकडे दुर्लक्षसाहुली गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी २० वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आयुध निर्माणी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात दाखविलेल्या विलंबामुळे जमावाचा रोष वाढला.

 हुंदके, गहिवर आणि अश्रूंनी स्मशान थरारले !हुंदके, गहिवर, अनावर अश्रू आणि आक्रंदन अशा काळीज हेलावणाऱ्या वातावरणाने शनिवारी स्मशानही थरारले. एकाच वेळी आठ जणांचे पार्थिव रांगेत ठेवलेले पाहण्याचे दुर्भाग्य जवाहरनगर आयुध निर्माणीच्या भूमीने अनुभवले. या आठही कामगारांवर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ध्यानी मनी नसतानाही काळाने चोर पावलाने येऊन घाला घातला. कुणाच्या घरचा लेक गेला, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, तर कुणाचे कुंकू पुसले गेले. 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीप्रकल्पात कामावर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. यावरून कामगार संघटनाही आक्रमक झाल्या. मृतांमध्ये प्रशिक्षणार्थी अंकित भूषण बारई (२०) याचाही समावेश होता. तर प्रशिक्षणार्थी सुनीलकुमार यादव  गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे.साहुलीच्या सरपंचांनी जवाहरनगर पोलिसात शुक्रवारी रात्री तक्रार देऊन महाव्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अतिसंवेदनशील विभागामध्ये प्रशिक्षणार्थी व्यक्तीला बळजबरीने कामाला पाठविले जाते, असा कामगार संघटनांचा आरोप आहे.

एक कोटीचे अर्थसाहाय्यभंडारा :  स्फोटाच्या आणि मनुष्यहानीच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी शनिवारी सायंकाळी दिली. तसेच, या घटनेत दगावलेल्यांपैकी स्थायी कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणि १५ दिवसांत नोकरीची हमी यावेळी पालकमंत्री संजय सावकारे यांंनी दिली.मंत्री फुंडकर आणि पालकमंत्री सावकारे यांनी  घटनास्थळाची पाहणी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रशिक्षणार्थींना जोखिमीच्या युनिटमध्ये कामासाठी पाठविणे मुळीच योग्य नव्हते. याची चौकशी केली जाईल, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.मदतीबद्दल पालकमंत्री म्हणाले, सर्व स्थायी कामगारांच्या कुटुंबीयांना जवळपास एक कोटींची मदत दिली जाईल. यात, २५ लाख केंद्र सरकारकडून, ५ लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून, कामगार नुकसान भरपाई म्हणून १५ लाख, वेतन विमा योजनेतून ४० लाख तसेच नियमानुसार सहापेक्षा अधिक व्यक्तींचा अपघाती मृत्यू होत असल्यास तरतुदीनुसार पाच लाख रुपये आणि अन्य रक्कम असे एक कोटींचे अर्थसहाय्य प्रत्येकी दिले जाईल.कुटुंबातील एका जणाला १५ दिवसांत नोकरी दिली जाईल. शिवाय अस्थायींच्या लाभासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगBlastस्फोट