शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:19 IST

आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.

ठळक मुद्देभगवान सुखदेवे : लाखनीत रंगले कवी संमेलन, ब्रोकन मेन मल्टीपर्पजचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.ब्रोकन मेन मल्टीपर्पज सोसायटी लाखनीद्वारा आंबेडकरी साहित्य संमेलन, कवी संमेलन, निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारोह महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी सी.एम. बागडे, कवी वामन शेळमाके प्रा. प्रमोदकुमार अणेराव, प्रा. डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. डॉ. उमेश बंसोड, प्रा. प्रल्हाद सोनेवाने, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, नामदेव कानेकर आदी उपस्थित होते.ते म्हणाले, विज्ञानवादी बुद्धिस्ट संस्कृती आपोआप आमुलाग्र बदलांचे, वैचारिक सम्यक ज्ञान आहे. समाजशील मन परिवर्तनाचे साहित्य विशेष अंगाने परिचित असताना एक संवेदनशील शतकांची पार्श्वभूमी तिचे स्वरूप लेखनकार्य, घटनात्मक, आंदोलनात्मक वृत्तीचे असून दर्जा व अधिकार आंदोलनातून करीत होतो. साहित्याची निर्मिती क्रांतीच्या प्रक्रियेला गतीमान करणारी शक्ती आहे. कवितेत क्रांती होत नसली तरी ती विचाराचंी ठिणगी टाकीत आचाराला प्रवृत्त करते. आंबेडकरी कवी आपल्या कवितेला आपल्या लढण्याचे शस्त्र समजतो.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर मी, मरणाला भीणार नाही, असा बलस्थानी संदेश मुन्ना नंदागवळी यांनी दिला. संतापाला जर कर्तृत्व, विशाल सामाजिक जाणीव, संयम आणि कल्पकता यांची जोड तर, ही क्रांती घडवून आणू शकते. क्रांतीपुत्रांनो, पसाभर उजेडासाठी मोनाद कसे सी.एम. बागडे यांनी तर, कवी वामन शेळमाके भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तुझ्या चळवळीचे तुकडे झालेच नसते. ही कष्टाची आत्मनिष्ठा, सामाजिक बांधिलकी कोणीही नाकारू शकत नाही. बहुजनांची उद्वेगजनक परिस्थितीमुळे कवी स्वाभाविक अस्वस्थ आहे. अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. 'भीम के दिवानो तुम्हे भीमजी के राहो पर चलना होगा, चाहे काटे क्यू ना हो, तुफानों से लढना होगा' कवी आकाश भैसारे यांनी खंत मनाला निर्णायक पवित्रा घेते. मित्रा, तू याच भूमीतला, मीही याच भूमीतला मग तुझ्यात माझ्यात का हे अंतर, कुठवर चालायच निरंतर कविता सादर केली. यावेळी मनोज बारसागडे, शिवानी काटकर, डॉ. हटणागर, अ‍ॅड. प्रशांत गणवीर, निकेत हुमणे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो श्रोतगण प्रामुख्याने उपस्थित होते.कवी संमेलनाचे संचालन प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी तर, आभार प्रदर्शन सी.एम. बागडे यांनी केले.