शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:19 IST

आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.

ठळक मुद्देभगवान सुखदेवे : लाखनीत रंगले कवी संमेलन, ब्रोकन मेन मल्टीपर्पजचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले.ब्रोकन मेन मल्टीपर्पज सोसायटी लाखनीद्वारा आंबेडकरी साहित्य संमेलन, कवी संमेलन, निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरण समारोह महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी सी.एम. बागडे, कवी वामन शेळमाके प्रा. प्रमोदकुमार अणेराव, प्रा. डॉ. के.एल. देशपांडे, प्रा. डॉ. उमेश बंसोड, प्रा. प्रल्हाद सोनेवाने, प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, नामदेव कानेकर आदी उपस्थित होते.ते म्हणाले, विज्ञानवादी बुद्धिस्ट संस्कृती आपोआप आमुलाग्र बदलांचे, वैचारिक सम्यक ज्ञान आहे. समाजशील मन परिवर्तनाचे साहित्य विशेष अंगाने परिचित असताना एक संवेदनशील शतकांची पार्श्वभूमी तिचे स्वरूप लेखनकार्य, घटनात्मक, आंदोलनात्मक वृत्तीचे असून दर्जा व अधिकार आंदोलनातून करीत होतो. साहित्याची निर्मिती क्रांतीच्या प्रक्रियेला गतीमान करणारी शक्ती आहे. कवितेत क्रांती होत नसली तरी ती विचाराचंी ठिणगी टाकीत आचाराला प्रवृत्त करते. आंबेडकरी कवी आपल्या कवितेला आपल्या लढण्याचे शस्त्र समजतो.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गीनंतर मी, मरणाला भीणार नाही, असा बलस्थानी संदेश मुन्ना नंदागवळी यांनी दिला. संतापाला जर कर्तृत्व, विशाल सामाजिक जाणीव, संयम आणि कल्पकता यांची जोड तर, ही क्रांती घडवून आणू शकते. क्रांतीपुत्रांनो, पसाभर उजेडासाठी मोनाद कसे सी.एम. बागडे यांनी तर, कवी वामन शेळमाके भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर तुझ्या चळवळीचे तुकडे झालेच नसते. ही कष्टाची आत्मनिष्ठा, सामाजिक बांधिलकी कोणीही नाकारू शकत नाही. बहुजनांची उद्वेगजनक परिस्थितीमुळे कवी स्वाभाविक अस्वस्थ आहे. अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर आवासून उभा आहे. 'भीम के दिवानो तुम्हे भीमजी के राहो पर चलना होगा, चाहे काटे क्यू ना हो, तुफानों से लढना होगा' कवी आकाश भैसारे यांनी खंत मनाला निर्णायक पवित्रा घेते. मित्रा, तू याच भूमीतला, मीही याच भूमीतला मग तुझ्यात माझ्यात का हे अंतर, कुठवर चालायच निरंतर कविता सादर केली. यावेळी मनोज बारसागडे, शिवानी काटकर, डॉ. हटणागर, अ‍ॅड. प्रशांत गणवीर, निकेत हुमणे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो श्रोतगण प्रामुख्याने उपस्थित होते.कवी संमेलनाचे संचालन प्रा. डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी तर, आभार प्रदर्शन सी.एम. बागडे यांनी केले.