शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

राष्ट्रसंतांच्या संदेशसाठी ‘अमरनाथ’वारी

By admin | Updated: June 8, 2016 00:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून भारतीयांना एकतेचा संदेश दिला. धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण होवून दंगे भडकते.

आंधळगावचे किरण सातपुते दुचाकीने रवानाया भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा देहे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू देभंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनातून भारतीयांना एकतेचा संदेश दिला. धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण होवून दंगे भडकते. त्यामुळे भारताची अस्मिता धोक्यात आली आहे. भारतीप्रती सर्वांमध्ये एकतेचे बीजारोपण व्हावे, व देशात शांतता नांदावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओजस्वी वाणीतून निघालेल्या भजनाने प्रेरित झालेला मोहाडी तालुक्यातील आंधळगांव येथील किरण सातपुते हे भारताच्या अखंडतेसाठी दुचाकीनेच जनजागृती करीत बाबा बर्फानीच्या अमरनाथ यात्रेसाठी निघाले आहे.आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यामुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक, सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली.महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून केला. ग्रामगीतेचं वाचन खेडोपाडी मोठ्या आदराने केलं गलं. आजही केलं जातं. प्रासादिक भाषा, लोककल्याणाची तळतळ, खरं आणि समाजहितकारक ते सांगण्याइतका स्पष्टपणा या साऱ्याच पैलूंचं सुरेख दर्शन ग्रामगीतामध्ये होतं. तुकडोजी महाराजांना पुढे राष्ट्रसंत म्हणून गौरविले गेले. पण त्याहीपूर्वी ते ग्रामीण भागातल्या सामान्यजनांच्या मनीमानसी कधीच जाऊन बसले होते. याचे कारण त्यांच्या जीवनामधील अंधाराला मागे हटवून प्रकाशाची सोनेरी आश्वासक किरणे आणण्यासाठीच त्यांनी आपली सारं आयुष्य वेचलं होतं.अशा या राष्ट्रसंतांनी, सामाजिक ऐक्यासाठी देशाला संदेश दिला. त्यांनी खंजेरी भजनातून, ‘माणूस द्या मज माणूस द्या’ असा संदेश दिला. या संदेशाने प्रेरित होवून राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचविण्यासाठी आंधळगांव येथील किरण सातपुते यांनी आजपासून बाबा अमरनाथ यात्रेला प्रारंभ केला आहे. किरण सातपुते यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी, राष्ट्रसंतांचे विचार व पाण्याची बचत संदेशसाठी अमरनाथ यात्रा करीत असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)