शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

सर्वच पोलीस ठाणे हायटेक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:56 PM

जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : पोलीस टेक एक्स्पोचे उद्घाटन, भंडारा शहरात लागणार सीसीटीव्हीचे जाळे

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित ‘टेक एक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिल कुळकर्णी उपस्थित होते.यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, भंडारा पोलीस दलाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. टेक एक्स्पो हे प्रदर्शन पोलिसांच्या आधुनिकी करणाचे महत्त्व विषद करणारे आहे. भंडारा शहरातील गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येईल. याशिवाय तालुक्याचे शहर व मोठया गावात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल. पोलीस विभाग हायटेक करण्यासाठी यापुढेही निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वीज चोरीचे गुन्हेसुध्दा आता पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी शासन आदेश निर्गमित झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी दोन पोलीस ठाणे असणार आहेत. या ठिकाणीच वीज चोरीचे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया होईल.यावेळी आमदार डॉ.परिणय फुके व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची समयोचित भाषणे झाली. टेक एक्स्पोच्या आयोजनामागची भूमिका जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी प्रास्ताविकातून मांडली. शासनाने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला असून तंत्रज्ञान व सोशल मीडियामध्ये घडणाºया गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे याबाबतची माहिती या प्रर्दशनाच्या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी तर आभारप्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केले.महिनाभरात होणार ग्रामरक्षक दल गठितअवैध व्यवसायाला व अवैध दारूला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिनाभरात ग्रामरक्षक दल गठित केले जातील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अवैध दारू व अवैध व्यवसायासंबंधी ग्रामरक्षक दलाने तक्रार केल्यास १२ तासाच्या आत आळा घालण्याचे काम पोलीस विभागाने करावे, असे या कायद्यात नमुद आहे.अशी आहे प्रदर्शनीया प्रदर्शनीत फिरते पोलीस ठाणे, सायबर क्राईम, शस्त्र व दारू गोळा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वाहतुक नियंत्रण सायबर फॉरेन्सिक, अंगुली मुद्रा केंद्र, नक्षल विरोधी अभियान, अंमली पदार्थ विरोधी शाखा, बिनतारी संदेश, दामिनी पथक, आॅनलाईन एफआयआर, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य, महिला बाल विकास विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलवर नागरिकांना तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित बाबींची माहिती दिली जाणार आहे.