शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्ह्यात सर्वदूर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:57 IST

चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देरोवणीला वेग : वैनगंगेचा जलस्तर वाढला, गोसे धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे. सखल भागात पाणी शिरल्याने काही गावांमध्ये जाण्याचे रस्ते बंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.बुधवार रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. बुधवारी जिल्ह्यात सरासरी ११.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परंतु गुरुवारी काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. मात्र यामुळे किती घरांची पडझड अथवा कुठे नुकसान झाली याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. कारधा येथे वैनगंगा नदीची पातळी ६.३६ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. तर गोसेखुर्द धरणाची पातळी २४३.३६ मीटर आहे. सायंकाळी धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. भंडारा तालुक्यांतर्गत आतापर्यंत सहा मंडळांतर्गत ६७ टक्के पाऊस झाला आहे. यासह मोहाडीच्या सहा मंडळांतर्गत ६२, तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या पाच मंडळामध्ये ७२ टक्के, पवनी तालुक्यांतर्गत येणाºया सहा मंडळामध्ये १३३ टक्के, साकोली तालुक्यांतर्गत येणाºया तीन मंडळामध्ये ७८ टक्के, लाखांदुरात ८२ टक्के तर लाखनीच्या चार मंडळांतर्गत ६० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीतसंततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. चार दिवसांपूर्वी ओसरलेला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे खळखळून वाहू लागले आहेत. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही जाणवला. पाण्याची झळ सतत सुरु असल्याने अनेकांना घराबाहेर निघणेही मुश्कील झाले. दमदार पावसामुळे रोवणीच्या कामाला जोर आला असला तरी शिवारात चिखल करण्यासाठी बळीराजाला पावसाच्या उसंतची गरज आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र होते. पवनी, लाखांदूर, साकोली तालुक्यात अतिवृष्टीची माहिती आहे.

टॅग्स :Rainपाऊस