शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारूच्या व्यसनाने केला घात, संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील महेंद्र मिताराम शिंगाडे आणि पहेला येथील मेघा यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. सुरुवातीला सुखाचा संसार सुरू होता. या दांपत्याच्या संसारवेलीवर एक गोंडस फूलही जन्माला आले. घरात कोडकौतुक सुरू होते. अशातच संगणक ऑपरेटर असलेल्या महेंद्रला दारूचे व्यसन लागले. त्यातून आर्थिक चणचण जाणवू लागली. घरात वाद होऊ लागले. व्यसनासाठी महेंद्रने अनेकांकडून उसनवार पैसे घेतले होते. तेच पैसे मागण्यासाठी काही जण घरी येत होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दारूचे व्यसन कसे संसार उद्ध्वस्त करतात याचा पदोपदी अनुभव येतो. दारूचे व्यसन असलेल्या कुटुंबाचे सुख समाधान कसे हिरावले जाते, याची उदाहरणे आसपास पाहायला मिळतात. अशाच दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाची राखरांगोळी झाली. पत्नीने किरकोळ वादात पेटवून घेतले. तिला वाचविताना पतीही जळाला आणि क्षणात दोघांचाही जळून मृत्यू झाला. तीन वर्षाचा चिमुकला पोरका झाला. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले.भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील महेंद्र मिताराम शिंगाडे आणि पहेला येथील मेघा यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. सुरुवातीला सुखाचा संसार सुरू होता. या दांपत्याच्या संसारवेलीवर एक गोंडस फूलही जन्माला आले. घरात कोडकौतुक सुरू होते. अशातच संगणक ऑपरेटर असलेल्या महेंद्रला दारूचे व्यसन लागले. त्यातून आर्थिक चणचण जाणवू लागली. घरात वाद होऊ लागले. व्यसनासाठी महेंद्रने अनेकांकडून उसनवार पैसे घेतले होते. तेच पैसे मागण्यासाठी काही जण घरी येत होते. परंतु मेघाला हा प्रकार पसंत नव्हता. तिने याबाबत त्याला वारंवार सांगितलेही. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शनिवारीही याच कारणावरून महेंद्र आणि मेघा यांच्यात वाद झाला. वादात रागाच्या भरात मेघाने अंगावर राॅकेल ओतून घेतले. पत्नी पेटत असल्याचे पाहून महेंद्र तिच्या मदतीला धावला. मात्र दोघांचाही काही क्षणातच जळून मृत्यू झाला. दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाची राखरांगोळी झाली. भिलेवाडा गावासह जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

तीन वर्षाचा रिहान झाला पोरका- आजी-आजोबांचा लाडका असलेला रिहान आई-वडिलांच्या मृत्यूने आता पोरका झाला आहे. रिहानचा जन्म झाला तेव्हा घरात काय कोडकौतुक होते. प्रत्येकाच्या लाडाचा रिहान होता. मात्र वडिलांच्या दारुच्या व्यसनाने एका तीन वर्षाच्या चिमुकल्यावर आता पोरका होण्याची वेळ आली आहे.

मेघा दारात तर महेंद्र घरातच कोसळला- मिताराम शिंगाडे यांना महेंद्र आणि विवेकानंद ही दोन मुले आहेत. दोघेही भाऊ एकाच घरात वेगवेगळे राहत होते. तेथेच आईवडीलही राहत होते. शनिवारी रात्री भाऊ विवेकानंद आणि त्याची पत्नी अलका जेवणानंतर बाहेर फिरायला गेले. त्यावेळी या दोघांचा वाद सुरू होता. दरवाजाही उघडा होता. परत आले तेव्हा दार बंद दिसले आणि घरातही शांतता दिसत होती. मात्र काही वेळातच आरडाओरडा झाला. जळालेल्या अवस्थेत मेघा दाराच्या बाहेर कोसळली तर महेंद्र घरातच कोसळला. या दोघांना विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्वकाही संपले होते. यावेळी घरातील मंडळींचा आक्रोश मन हेलावुन टाकणारा होता.

खाकी वर्दीही हळहळली - पती-पत्नीने पेटवून घेतल्याची माहिती कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांना घटनेनंतर अवघ्या काही वेळातच मोबाइलवर मिळाली. तत्काळ ते आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मिसळे ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील शिंगाडे कुटुंबाच्या घरी गेले. दारात जळलेल्या अवस्थेत पडून असलेली मेघा आणि घरात मृत्युमुखी पडलेला महेंद्र हे दृष्य पाहून पोलीसही क्षणभर अवाक झाले. तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आक्रोश पाहून खाकी वर्दीही हळहळली. काय दोष या चिमुकल्याचा, असेच पोलीस म्हणत होते.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी