शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग झाला ‘पंगू’

By admin | Updated: January 12, 2015 22:45 IST

येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लाखांदूर : येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांच्या लाभाच्या अनेक महत्वपूर्ण योजना यापूर्वी राबविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व योजनांचा लाभ मिळत होता. पंरतु शासनाने यात मोठे बदल घडवून आणून पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या कृषि अभियांत्रीकीकरण योजना, राज्य पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजना, कडधान्य विकास कार्यक्रम योजना, गळीत धान्य विकास कार्यक्रम योजना व इतर योजना ह्या तालुका कृषि विभागाकडे वळविण्यात आल्या. यातून बियाणे वाटप, शेती उपयोगी औजारे वाटप, ताडपत्री वाटप तसेच शेतपिकांसदर्भात अनेक महत्वाच्या योजना वर्ग करण्यात आले आहेत. आता पंचायत समिती कृषि विभागाकडे कुठलेच महत्वाचे कृषि विषयक काम उरले नसल्याने कृषि विभाग पंगू झाल्याचे दिसत आहे.तालुका कृषि विभागाकडे यापूर्वी शेतकऱ्यांसदर्भात कुठल्याच प्रकारच्या योजना वा संबंध येत नसल्याने हा विभाग शेतकऱ्यांपासून अलिप्त मानल्या जात होता. आता सर्व कृषि विषयक योजना या विभागाकडे देण्यात आल्या असल्या तरी शेतकरी वर्गात तिव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषि विभागाकडेच त्या योजना पूर्ववत कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अप्पर आयुक्त विस्तार कृषि विभाग भारत सरकार दिल्ली यांनी नुकतीच लाखांदूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषि विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी आत्मा संघटनेचे सदस्य तथा शेतकरी भाऊ रामटेके यांनी अप्पर आयुक्तांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती कृषि विभागाकडे योजना पूर्ववत करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी सुध्दा पाठिंबा देऊन मागणी रेटून धरली होती. (तालुका प्रतिनिधी)