शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

कृषी विभाग झाला ‘पंगू’

By admin | Updated: January 12, 2015 22:45 IST

येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लाखांदूर : येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांच्या लाभाच्या अनेक महत्वपूर्ण योजना यापूर्वी राबविल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व योजनांचा लाभ मिळत होता. पंरतु शासनाने यात मोठे बदल घडवून आणून पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या कृषि अभियांत्रीकीकरण योजना, राज्य पुरस्कृत अभियांत्रिकीकरण योजना, कडधान्य विकास कार्यक्रम योजना, गळीत धान्य विकास कार्यक्रम योजना व इतर योजना ह्या तालुका कृषि विभागाकडे वळविण्यात आल्या. यातून बियाणे वाटप, शेती उपयोगी औजारे वाटप, ताडपत्री वाटप तसेच शेतपिकांसदर्भात अनेक महत्वाच्या योजना वर्ग करण्यात आले आहेत. आता पंचायत समिती कृषि विभागाकडे कुठलेच महत्वाचे कृषि विषयक काम उरले नसल्याने कृषि विभाग पंगू झाल्याचे दिसत आहे.तालुका कृषि विभागाकडे यापूर्वी शेतकऱ्यांसदर्भात कुठल्याच प्रकारच्या योजना वा संबंध येत नसल्याने हा विभाग शेतकऱ्यांपासून अलिप्त मानल्या जात होता. आता सर्व कृषि विषयक योजना या विभागाकडे देण्यात आल्या असल्या तरी शेतकरी वर्गात तिव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषि विभागाकडेच त्या योजना पूर्ववत कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अप्पर आयुक्त विस्तार कृषि विभाग भारत सरकार दिल्ली यांनी नुकतीच लाखांदूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषि विषयक आढावा बैठक घेतली. यावेळी आत्मा संघटनेचे सदस्य तथा शेतकरी भाऊ रामटेके यांनी अप्पर आयुक्तांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती कृषि विभागाकडे योजना पूर्ववत करण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी सुध्दा पाठिंबा देऊन मागणी रेटून धरली होती. (तालुका प्रतिनिधी)