शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

देयक न पाठविता बंद केले कृषीपंप

By admin | Updated: August 18, 2016 00:20 IST

कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.

वीज मंडळाची अरेरावी : शेतकऱ्यांवर अस्मानी संकटभंडारा : कृषीपंपाचे देयक न पाठविता वीज जोडणी खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे. कनिष्ठ अभियंता व लाईनमेनच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून न्याय कुणाला मागायचा असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत असे की, धारगाव फिडर अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा येथील अनेक शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा लाईनमेननी खंडीत केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. अनेकदा या विषयी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले. अखेर २० दिवसानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार का केली म्हणून रुखमा लांजेवार या महिला शेतकऱ्याचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत करण्यात आला. सदर शेतकऱ्याच्या कृषी पंपाची दीड महिन्यापूर्वी वीज जोडणी करण्यात आली. केवळ दीड महिना लोटला असताना त्याचे देयक सुद्धा पाठविण्यात आले नाही. देयक पाठविले नसताना देयक भरण्याचे अधिकारी सांगत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांचे वीज जोडणी खंडीत न करता हेतुपुरस्सर एका महिला शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रकार उजेडात आला आहे. लाईनमेन जांगडे व त्याचा सहकारी सोनकुसरे यांनी हा प्रकार हेतुपुरस्सर केल्याचा आरोप आहे. बेजवाबदार कर्मचाऱ्यावर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी महिला शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान मंगळवार रोजी जवळपास १० शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. वरिष्ठांच्या आदेशानंतर वीज पुरवठा सुरु करण्यात आला. मात्र वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून लांजेवार यांचा वीज प्रवाह खांबावरून बंद करण्यात आला. लाईनमेन व त्याचे सहकारी यांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे कृषीपंप धारकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी उर्जामंत्री सोबत असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे त्यांच्या अधिनस्थ असलेले अधिकारी - कर्मचारी मात्र शेतकऱ्यांची गळचेपी करीत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)