शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आगीत 12 लाखांचे कृषी साहित्य भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:36 IST

दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : कृषी केंद्राला लागलेल्या आगीत १२ लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील दिघोरीमोठी येथे शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली उघडकीस आली. आगीत कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक, रब्बी हंगामाचे धान बियाणे जळून खाक झाले. एका ट्रकचालकाला कृषी केंद्रातून पहाटे धूर निघत असल्याचे दिसल्याने आगीचा हा प्रकार पुढे आला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.दिघोरी येथील मुखरू कापसे यांच्या गावाच्या मध्यवस्तीत शिवश्रद्धा कृषी केंद्र आहे. गुरुवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद केले आणि घरी गेले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला कृषी केंद्रातून धूर निघत असल्याचे दिसले. ट्रकचालक गावातीलच असल्याने त्याने कृषी केंद्राचे मालक मखरू कापसे यांना फोन करून कृषी केंद्रातून धूर निघत असल्याची माहिती दिली. ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. बंद दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसून आले. तोपर्यंत गावकरीही गोळा झाले.  कृषी केंद्राचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला, तर ते गरम झालेले होते. परिस्थितीत नागरिकांनी मोठ्या प्रयत्नाने शटर उघडले. कृषी केंद्रातील औषधी, बी-बियाणे व कीटकनाशके जळत असल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य भस्मसात झाले होते. काउंटरवर असलेले संगणक, रोख रक्कम, आदी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मखरू कापसे यांनी दिघोरी पोलिस ठाण्यासह वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच तलाठी संजय मेश्राम यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून प्राथमिक अंदाजानुसार १२ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज- कापसे यांच्या शिवश्रद्धा कृषी केंद्राला शॉर्टसर्किटमुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असून तपास दिघोरीचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

टॅग्स :fireआग