शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

तंत्रज्ञानाच्या युगात यंत्राने शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:00 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार, तो हीे पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्याला फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेती झाली महाग : निसर्गाची साथ अन् शासनाची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा विकास ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार, तो हीे पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्याला फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मनुष्यबळाचा, बैलांचा वापर करून शेतातील वखरणी, नांगरणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे होत होती. यात शेतकरी शारीरिकदृष्ट्या दणकट होता. त्यासोबत योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपुरक साधने तयार होऊ लागली. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहेत.शेतकºयांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाचा उपयोग करीत कमी कष्टाळू झाली. पूर्वी बैलांच्या मदतीने शेताची वखरणी करण्यासाठी सहा - सात दिवस लागायचे. शेताच्या कामावर असणारा मजूर पहाटेच शेतात जाऊन वखर जुंपायचा. माळराणावरून (मचान) शेतकºयाची पत्नी हाक मारीत 'अव धणी चटणी - भाकर खायाला या हो' अशी सकाळी १०- ११ वाजताच्या दरम्यान आवाज शेतारानात घोंगायचा. आणलेली शिदोरी आपल्या बायकोसोबत सकाळची न्याहरी करायचा. यावेळी बैलालाही थोडा वेळ विश्रांती देऊन त्याला चारापाणी दिला जायचा. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की वखर मांडवात आणून थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. सायंकाळी परत ४ वाजतापासून त्याचे वखरणीचे काम सुरु व्हायचे. परंतु ते चित्र आज दिसेनासे झाले आहे. आज सामान्यातला सामान्य शेतकरीदेखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी करण्यास प्राधान्य देत आहे.यापुढे पैशाची तसेच वेळेचीही बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुरांची कमतरता हे सुद्धा कारण यांना कारणीभूत आहे. परिणामी शेतकºयांचे हात बळकट राहले नाही. वखरणी झाल्यानंतर पेरणी, निंदन, खुरपणी, कीटकनाशकाची फवारणी ही सर्व कामे आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे. एवढेच काय तर पीक काढण्यासाठी सुद्धा हार्वेस्टर मशीनचा उपयोग होऊ लागला आहे. शेतारानात चिमण्या - पाखरांचा घोंगावणारा आवाज यंत्रणाच्या आवाजात दबलेला आहे. माळराणातून शेतकºयाच्या पत्नीचे गाणे नाहीसे झाले. एवढे सर्व करूनही शेतकºयांचा विकास पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही.खताचा वारेमाप वापर, तणनाशक जाळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहीशी झाली. परिणामी निसर्गाची अवकृपा शेतकºयांच्या पाचवीला पुजलेली आहे. यातच शासनाचे दुर्लक्ष व शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्वीच्या परिस्थितीत होता. आजही त्याच अवस्थेत दिसून येत आहे.