शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बियाणे कंपनीनंतर निसर्गाचाही दगा

By admin | Updated: October 10, 2016 00:31 IST

एक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले.

आर्थिक संकट : अड्याळ व परिसरातील शेतकरी त्रस्त विशाल रणदिवे अड्याळएक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले. तेव्हा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पेरले पण उगवलेच नाही, असे घडले. त्यानंतर कृषी केंद्र चालकांनी दिलेली पावती व रिकाम्या बॅग, बियाणे बोगस निघालेल्या परत घेऊन पुन्हा पेरणी करायला धान्य बियाणे तर दिले. परंतु शेतकऱ्यांचा गेलेला वेळ, झालेला मानसिक त्रास व पेरणीसाठी येणारा खर्च मात्र दिला नाही. तरीसुद्धा बळीराजा थकला वा रुसला नाही. दुबार तिबार पेरणी करून मातीत मोती उगविले आणि मोती जेव्हा मातीमोल जर होत असेल तर काय अवस्था होईल त्या शेतकऱ्याची? असाच काहीसा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.अड्याळ व परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुष्कळ काही करतात आणि करतोही म्हणतात. परंतु गेल्या १२ वर्षापासून कृषी उत्पन्न समितीचा बाजार हा अड्याळ मधून बेपत्ता आहे. तो सुरु व्हावा म्हणून शेतकरी चर्चा करतात. मग शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना यासाठी अपयश का आले असणार? याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती की सत्ता बदलीचा परिणाम असावा की दमदार नेतृत्वाचे नेते मंडळी नसल्याचे कारण? अशा अनेक प्रश्नात अड्याळ व परिसरातील शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विषयी बोलताना आढळतो. यावर्षी येथील शेतकऱ्यांना पाऊस वेळेवर पडला नाही. कधी पेरले पण उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी, पेरलेल्या बियाण्यांना वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने तिबार पेरणी केली. शेतात जेवढा पाणी तेवढीच रोवणी. थेंबे थेंबे तळे साचे, या प्रमाणे करून पूर्ण मळा फुलविला. त्यानंतर नेरला उपसा सिंचन सुरु केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. काही दिवसाआधी शेतकरी व त्याचे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आठवड्यात आलेल्या बेमोसमी पावसामुळे मात्र मेहनतीवर पाणी फिरण्याचे लक्षण दिसत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाल्याचे दिसत आहे.मागील वर्षीपेक्षा यावर्षी पीक चांगली भरभरून उभी होती. परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळे डौलात डोलणारी उभी पिक आज मात्र जमिनदोस्त झाली आहेत. जेवढे दु:ख पेरले पण उगवले नाही त्यावेळपेक्षाही आता उभी पिक पाण्यात गेल्यामुळे होत आहे. शेतकऱ्यांनी गोष्ट ऐकायची कुणाची विश्वास ठेवावा कुणावर? हवामान खात्याचे अंदाज फोल ठरतात, नवनवीन जास्त उत्पादन देण्याचे दावे सांगणारे बियाणे कंपनी ही लुबाडणूक करायला थांबत नाही. निसर्ग ऋतू चक्रावरचा विश्वासही राहिलेला नाही. मग करायचे काय? समजा समस्त शेतकऱ्यांनी शेती कसणे जर बंद केले अशी कल्पना जरी केले तर काय होईल. म्हणण्यापेक्षा काय काय नाही होईल म्हणून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि त्यामुळे अन्नाला जो मेहनतीने उत्पन्न करतो त्याकडे बाकीपेक्षा आधी लक्ष देणे आहे.