शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अखेर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाटप

By admin | Updated: February 24, 2017 00:35 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील

तातडीची सभा : दुकानदारांना याद्यांचे वितरणमोहाडी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना तातडीने तहसिलमध्ये बोलावण्यात आले. तातडीची सभा घेण्यात आली. सभेतच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. त्यामुळे आता दुकानात पोहचलेले धान्य लाभार्थ्यांपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार झाल्या नाहीत. तथापि, लाभार्थी कोण याचा पत्ता नसताना इष्टांकानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ पोहचले होते. त्या धान्याचे वाटप करण्याची अडचण होती. काल लोकमतमध्ये लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात ही बातमी प्रकाशित झाली. प्रकाशित झालेल्या बातमीमुळे तहसिल कार्यालयातील प्रशासन एकच खळबळ निर्माण झाली. तीन महिन्यापासून याद्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या धान्य दुकानदारांना गुरूवारी तहसिल कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्या दुकानदारांची सभा तहसलिदार धनंजय देशमुख यांनी घेतली. सभेत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. तसेच तातडीने यादीतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात यावे तसेच लाभ घेण्याऱ्या व्यक्तींच्या याद्यातील नावे अंतिम नाहीत. त्या याद्या ग्रामदक्षता समितीसमोर आणाव्यात. याद्यामध्ये चुकां होवू शकतात, असे प्रामाणिकपणे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. आज १०६ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी ६३ धान्य दुकानदारांना याद्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच याद्या वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याच धान्य दुकानदारांपर्यंत सभेचा संदेश पोहचला नाही. बरेच धान्य दुकानदार सभेला पोहचले नव्हते. त्यामुळे त्या दुकानदारांना वैयक्तीकपणे मोबाईलवर संदेश देणे सुरू आहे. शक्य तेवढ्या लवकर धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्याचे धान्य पास करण्यात आल्याची माहिती आहे. आज ७३ धान्य दुकानदारांना याद्या प्राप्त झाल्या. त्या याद्यांमध्ये सधन व्यक्तीचे नाव आत सुरक्षा योजनेत समाविष्ट असल्याची माहिती मिळाली. यादीमधील त्या अपात्र व्यक्तीला लाभ दिला जाईल. गावात दूषित वातावरण तयार होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या याद्या स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्याची मागणी काहींनी केली आहे. याद्यांचे वाचन ग्रामसभेत झाल्यानंतर त्या याद्यांना अंतिम प्रारूप देण्यात यावे. याद्या पूर्णनिरीक्षण झाल्यानंतर याद्यांना अंतिम मान्यता दिली जावी. त्यावर पुन्हा तहसिलदार यांची स्वाक्षश्रीनिशी त्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांना पाठविण्यात याव्यात अशी मागणी आहे. याद्यामध्ये नक्कीच घोळ आहे अशी चर्चा बाहेर पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)