शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही गोवारी समाज अधांतरी

By admin | Updated: November 27, 2014 23:29 IST

समाजातील प्रत्येक घटकाला शासनाने प्रगती व विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वर्गानुसार व जातीनुसार आरक्षण उपलब्ध करून दिले आहे.

मोहाडी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाने प्रगती व विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वर्गानुसार व जातीनुसार आरक्षण उपलब्ध करून दिले आहे. परंतु समाजातील आदिम घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र्य लढयात महत्वाचे स्थान असणाऱ्या गोवारी समाजाच्या वाट्याला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही नेहमी उपेक्षा आली आहे.गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय गोपालन व शेळीपालन करण्याचा आहे. २१ व्या शतकात गोवारी समाजाच्या वाट्याला दुर्दैव आले आहे. गोवारी समाजात अनेक गरीब उपजातींचा समावेश आहे. तरीही त्यांच्या वाट्याला फक्त २ टक्के आरक्षण, त्यामुळे या समाजाच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्या आहेत. आपल्याला आपले हक्क मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी लहान मुलांपासून तर वृद्ध पडक्यात भाकरी बांधून जमले होते. दिवसभर अनेक मंत्र्यांना विनवन्या करूनही एकही मंत्री मोर्चाला सामोरे न आल्याने नेत्यांच्या निराशेतून जमाव हिरमुसला. याचवेळी मोर्चातील उपस्थितामध्ये चलबिचल सुरू झाल्याचे हेरून नेतृत्वहीन समाजावर पोलिसांनी अंधाधुंद लाठीमार केला. लहानांपासून, तरूण वृद्धापर्यंत सर्वाच्या चेहऱ्यावर स्वाभिमान व हक्काचे तेज दिसत असताना रक्तरंजीत परिस्थिती निर्माण झाली. गोवारींच्या समस्येवर तोडगा न काढता पोलिसांनी लाठीमार केला. त्यात धावाधाव होवून रक्तामासाचा सडा पडला. आई, बाबा, काका, मामा असा आवाज करून जो तो पळू लागला. त्यात लहान बालकेही पायााखाली चिरडली गेली. त्यात अनेक घरे बेघर झाली, तर मुले पोरकी झाली. आई-वडिल मुलांसाठी अश्रुच्या सागरात बुडाली. त्या काळ्या दिवशी ११४ गोवारी बांधवाची निर्घृण हत्या झाली. शासनाने गोवारींचा आवाज दडपण्यासाठी आर्थिक भरपाई दिली व सीताबर्डीवडील उड्डाण पुलाला गोवारी उड्डाण पुल असे नाव दिले. पण त्यांना अधिकार दिले नाहीत. गोवारी हत्याकांड होवून आज २० वर्षे झाली. आदिवासीत्व बहाल करण्याची एकमेव मागणी जागच्या जागी, जशीच्या तशीच अडगळीत पडून आहे. त्यामुळे विकासाअभावी एक पिढी बर्बाद झाली आहे. अजून किती पिढ्यांच्या बर्बादाची वाट पाहणार आहेत, की कायमच अंगावर अंधार पांघरून ११४ गोवारींचे बलिदान वाया घालविणार याचा गांभीर्यपूर्वीक विचार करण्याची वेळ आली आहे. गोवारी जमात मुळातच नागरी संस्कृतीपासून कोसो मैल दूर आहे.हत्याकांडानंतर समाजाला संघटीत करून त्यांच्यात जनजागृती करणे, आपल्या अधिकाराच्या लढाईत शहीद झालेल्या लोकांच्या संदर्भात समाजाला जागृत करणे गरजेचे होते, परंतु समाजातील नेत्यांच्या असंघटीतपणामुळे एकता प्रस्थापित होण्यास आडकाठी निर्माण होत आहे. गारूड्याने डमरू वाजविताच साप-मुंगुसाची लढाई पाहण्यासाठी लहान मुले सभोवताल गोळा होतात, तसा प्रकार सुरू आहे. त्यामुळे समाजातील लोकांना न्याय मिळत नाही. हा समाज अद्यापही हालअपेष्टांच्या गर्तेत सापडला आहे. त्यातून बाहेर काढणारा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही ही खरी शोकांतिका आहे.(शहर प्रतिनिधी)